मराठवाड्यात पावसापेक्षा वादळाचा कहर; शेतकऱ्यांसह काही ठिकाणी मानवी हानी

Rain storm in Marathwada : मराठवाड्यात पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप पहायला मिळाला. कालपासून छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह (Marathwada) मुसळधार पावसाने थैमान घातले. केळी व पपईच्या बागा आडव्या पडल्या, विजेचे १७ उपकेंद्रे बधित, आणि शेकडो वीजखांब कोसळले. शेतकरी उभ्या पिकांच्या नुकसानीने हताश, तर महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आज (११ जुन) रात्री संभाजीनगर, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी पावसाने बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले. लातूर शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडल्याने विजेचा खेळखंडोबा झाला. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झालं. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात सिद्धार्थ उद्यानाची भींत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाटांची काढली कुंडली; वाचा, A टू Z स्टोरी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्य प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानात मोठी दुर्घटना घडली. पावसामुळं प्रवेशद्वाराच्या भिंतीच काही भाग कोसळला आणि या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर 5 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ज्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे त्या उद्यानातील कर्मचारी होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं त्या ठिकाणी दाखल झाले होते.
सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या नुतनीकरणाचं काम काही वर्षांपूर्वी झालं होतं. मात्र, इतक्या लवकर त्याचा भाग कोसळला असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून इतर 5 जण जखमी आहेत. या घटनेची जबाबदारी पालिका प्रशासनाकडून घेतली जाते का ते पाहावं लागणार आहे.