पाच उमेदवारांनी दिला पाठिंबा! भाजप आणि एमआयएम युतीचा पुन्हा प्रयोग, काय घडलं?
एमआयएम सोबतच्या युतीचा विषय अडचणीचा ठरल्याने भाजपने या अगोदर माघार घेतली आहे आणि आत्ताही तीच वेळ येती की काय असं चित्र निर्माण झालं आहे.
राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका (Election) सुरू असताना दुसरीकंड नगरपरिषदांच्या नव्या कारभाऱ्याला नियुक्त करणही राज्यभरातील अनेक शहरांत सुरू आहे. दरम्यान, भाजप आणि एमआयएम युतीचा दुसरा अंक पाहायला मिळाला आहे. गेल्या आठवड्यात भाजप आणि एमआयएमनं सोबत येत गट स्थापन केला. सत्ता स्थापनेसाठी परस्परविरोधी विचारधारा असलेले आणि एकमेकांविरोधात लढलेले पक्ष सोबत आले. ही युती राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकरणी भाजपच्या राज्य नेतृत्त्वानं स्थानिक आमदार प्रकाश भारसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
एमआयएम सोबतच्या युतीचा विषय अडचणीचा ठरल्याने भाजपने या अगोदर माघार घेतली आहे आणि आत्ताही तीच वेळ येती की काय असं चित्र निर्माण झालं आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक पाहायला मिळाला आहे. अकोट नगर परिषदेत एमआयएमच्या पाचही नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. एमआयएमच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपचे जितेन बरेठिया विजयी झाले. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली. अगदी टोकाच्या विचारधारा असलेले पक्ष अकोटमध्ये सोबत आले. त्यामुळे सत्तेपुढे सगळंच गौण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.
बीडच्या परळीत मोठी राजकीय घडामोड; एमआयएम शिंदेसेनेची युती झाली अन् तुटली
नगर परिषदेत सत्तेसाठी भाजप आणि एमआयएमनं गेल्याच आठवड्यात युती केली होती. त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. यानंतर आता दोन्ही पक्षांच्या युतीचा दुसरा अंक पाहायला मिळत आहे. एमआयएमनं स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपच्या जितेन बरेठिया यांचा पराभव केला. जितेन बरेठिया भाजपचे नेते आहेत. त्यांचे वडील रामचंद्र बरेठिया नगराध्यक्ष राहिलेले आहेत. तेदेखील भाजपचे नेते आहेत. एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानं बरेठिया निवडून आले.
एकीकडे भाजप विचारधारेवरुन एमआयएमला सातत्यानं लक्ष्य करत असताना दुसरीकडे त्यांचेच नेते अशा युती करत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. विचारधारेपेक्षा सत्ता महत्त्वाची असल्याची चर्चा यानंतर राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीचे पडसाद राज्यभरात उमटले. यानंतर युती गुंडाळण्यात आली. भाजपनं एमआयएमला आघाडीतून बाहेरचा रस्ता दाखवला आणि शिवसेना, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शप आणि प्रहार जनशक्ती यांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा केला.
