Live Blog | Thackeray Vs Shinde : आपण पुन्हा आयाराम-गयारामच्या युगात.. कोण एकनाथ शिंदे?

  • Written By: Published:
Live Blog | Thackeray Vs Shinde : आपण पुन्हा आयाराम-गयारामच्या युगात.. कोण एकनाथ शिंदे?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी आज सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील आतापर्यंत ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.

आज सुनावणीच्या दरम्यान पहिल्यांदा तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडली आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर केले जाईल. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी पुन्हा युक्तिवाद सुरू केला.

सुप्रीम कोर्टात सलग दोन आठवडे सुनावणी झाल्यानंतर या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. कोर्टाकडून येणाऱ्या या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातो आहे.

सुप्रीम कोर्टातील अपडेटसाठी

The liveblog has ended.

LIVE NEWS & UPDATES

  • 15 Mar 2023 03:36 PM (IST)

    कपिल सिब्बल म्हणाले,``आपण पुन्हा आयाराम-गयारामच्या युगात! कोण एकनाथ शिंदे?

    उद्धव ठाकरे यांच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी विधानसभेत आमदारांचा आकडा महत्वाचा नसून पक्षांची युती महत्वाची असते. वैयक्तिक आमदाराला येथे काही महत्व नाही. उद्या चार-पाच आमदार उठतील आणि सरकार पाडतील, असे होत नाही. आपण पुन्हा आयाराम-गयारामच्या युगात गेलो आहे. गुवाहटी येथे जाऊन भरत गोगावले यांना प्रतोद नेमले जाते. अस कसे काय होऊ शकते? \

    सिब्बल यांच्या या युक्तिवादावर तुषार मेहता यांनी आक्षेप घेतला. प्रतोद नेमण्याचा प्रश्न निकाली निघाल्याचे सांगत आता पूरक मांडणीमध्ये तो मुद्दा उपस्थित करण्याची गरज नसल्याचे मत मेहता यांनी मांडताच मी गेले पाच दिवस तुमचा युक्तिवाद ऐकला आहे. मी एकही शब्द मध्ये बोललेलो नाही. तुम्ही आता मला माझ्या पद्धतीने मांडणी करू द्या, असे सिब्बल यांनी सांगितले.

    शिवसेनेच्या विधानसभेच्या नेतेपदावरून एकनाथ शिंदे या काढून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. एकनाथ शिंदे कोण आहेत? मी घटनात्मकदृष्ट्या हा प्रश्न विचारतो आहे. ते शिवसेनेचे नेते होते. वैयक्तिक शिंदे यांना महत्व नाही. नेतेपदात हा बदल केल्याचे विधानसभा उपाध्यक्षांना कळवले होते. मग राज्यपाल त्यांना शपथविधीसाठी कसे काय बोलवतात? गुवाहटीत शिंदे यांची नेतेपदी नियुक्ती करणे वैध नाही. गेले पाच दिवस मी शिंदे गटाचा युक्तिवाद ऐकतो आहे. मी फूट पाडलेली नाही. मी विलीन झालेलो नाही. मीच शिवसेना आहे, असे शिंदे म्हणत आहे. पण ३४ आमदार आपणच शिवसेना आहोत, असे कसे काय म्हणू शकतात? मीच शिवसेना आहे, असे शिंदे म्हणत आहेत. त्यांच्या या म्हणण्याला काहीच अर्थ नाही, असे सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात मुद्दे मांडले.

    बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा शिंदे गटाकडून वारंवार उपस्थित करण्यात आला. त्यालाही उत्तर देण्याचा सिब्बल यांनी प्रयत्न केला. सर्वोच्च न्यालालयासमोर तत्कालीन सरकारने बंडखोरांच्या सुरक्षेची हमी दिली होती. याची आठवण सिब्बल करून दिली. तरी राज्यपालांनी या हमीच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला लावले, असा मुद्दा मांडला.

  • 15 Mar 2023 01:06 PM (IST)

    राज्यपालांनी बहुमत चाचणी का बोलवली?

    शिंदे गटाच्या ३४ आमदारांनी पक्षातून बाहेर पडले नसल्याचे सांगितले. त्यामुळे  राज्यपालांनी त्यांना शिवसेनेचेच सदस्य म्हणून गृहीत धरायला हवं होतं. मग जर ते शिवसेनेच्या ५६ सदस्यांपैकीच असतील तर मग बहुमत चाचणीचा प्रश्न कुठे येतो?

    कशाच्या आधारावर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिले?

    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा तुषार मेहतांना सवाल

  • 15 Mar 2023 12:49 PM (IST)

    अशा प्रकरणामुळे राज्याला कलंक लागतो

    यावेळी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत राज्य आहे. पण अशा प्रकरणामुळे राज्याला कलंक लागतो. सर्वोच्च न्यायालय म्हणून आम्हाला या सर्व गोष्टींची काळजी वाटते. अशी घटना घडणे महाराष्ट्रासाठी निराशाजनक आहे.

    CJI DY Chandrachud: All this hyperbole- it’s Maharashtra, it’s a very highly cultured and developed state. I mean, things are said in politics. Sometimes things are said which are inappropriate- they should never be said.#SupremeCourtOfIndia #ShivSenaCrisis

    — Live Law (@LiveLawIndia) March 15, 2023

  • 15 Mar 2023 12:49 PM (IST)

    सरकार पडेल अशी कृती राज्यपालांनी करायला नको होती

    तुषार मेहता यांना प्रश्न विचारताना सरन्यायाधीश म्हणाले की राज्यपालांनी चालू सरकारला बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले, हे सरकार पाडण्याचं पाऊल होत असे दिसून येत आहे. सरकार पडेल, अशी कोणतीही कृती राज्यपालांनी करायला नको होती. ते पुढे म्हणाले की बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच पत्र गृहीत धरलं.

    पण विरोधी पक्षनेत्याचे राज्यपालांना पत्र ही काही नवीन बाब नाही. आमदारांच्या जीवाला धोका म्हणून बहुमत चाचणी बोलावणे अयोग्य वाटते. अधिवेशन पुढे असतानाही राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली. दरम्यान राज्यपाल फक्त आमदारांच्या पत्रावर तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे जा, असं म्हणू शकता का ? असा प्रश्न सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तुषार मेहता यांना विचारला.

  • 15 Mar 2023 11:22 AM (IST)

    7 मुद्दयांवर युक्तीवाद करणार

    तुषार मेहता यांचा युक्तीवाद सुरू

    मी तासाभरात 7 मुद्दयांवर युक्तीवाद करणार आहे.

     

  • 15 Mar 2023 11:20 AM (IST)

    तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडत आहेत

    आजच्या सुनावणीची सुरुवात तुषार मेहता यांच्या युक्तिवादाने

    तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडत आहेत

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube