live now
Maharashtra Budget LIVE : अजित पवारांकडून अर्थसंकल्प सादर, वाचा कुणाला काय मिळालं?
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ सभागृहात सादर केला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
Maharashtra Budget Session : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ सभागृहात सादर केला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. आमलकी एकादशीचा पवित्र दिवस अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळते हे माझं भाग्य आहे. “लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो. पुन्हा आलो” अशा शब्दांत अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली.
LIVE NEWS & UPDATES
-
दरवर्षी 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषा सन्मान दिन साजरा करणार
यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
-
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार : अजित पवार
उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.
पुण्यातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी उभारणी
दोन टप्प्यातील काम पूर्ण, सरकार आणखी 50 कोटी देणार
छत्रपती संभाजी महाराजांच्या खुणा जिथं आहेत त्याचा खूणा संगमेश्वर येथे आहेत.
संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारलं जाणार
वढू तुळापूर येथे स्मारकाचं काम वेगानं सुरु
हरियाणातील पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचं यथायोग्य स्मारक
चैत्यभूमी दादर , इंदू मिल येथे स्मारकास निधी पुरवण्याचं काम
अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मारक
-
राज्यस्तरीत कबड्डी, कुस्ती स्पर्धांच्या अनुदानात वाढ
छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा, भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करुन ते प्रत्येकी 75 लाखावरुन 1 कोटी रुपये करण्यात येणार आहे.
-
पुण्यात दुसऱ्या टप्प्यात २ मेट्रो मार्ग उभारणार
पुण्यात दुसऱ्या टप्प्यात २ मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहेत. नळ स्टॉर- वारजे असा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार. दुसऱ्या टप्प्यातील दोन मेट्रो मार्गांसाठी ९८९७ कोटी रूपयांचा प्रस्ताव आहे. पुण्याच्या दोन मेट्रो मार्गांचा ्प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय.
-
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नमामि गोदावरी अभियान
सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने "नमामि गोदावरी" अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करुन त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे
-
राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना
राज्यात एकूण 18 नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली असून दर्यापूर - जिल्हा अमरावती, पौड, इंदापूर व जुन्नर - जिल्हा पुणे, पैठण व गंगापूर - जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आर्वी - जिल्हा वर्धा, काटोल - जिल्हा नागपूर, वणी - जिल्हा यवतमाळ, तुळजापूर - जिल्हा धाराशीव तसेच हिंगोली येथील न्यायालयांचा समावेश त्यात आहे.
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी 36 हजार कोटी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत २३ हजार २३२ कोटी खर्च झाले आहेत. २ कोटी ५३ लाख महिलांना लाभ मिळाला आहे. या योजनेत २०२५ -२६ मध्ये ३६ हजार कोटींची तरतूद केली आहे.
-
बचतगटांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार
नवी मुंबईत उलवेमध्ये 194 कोटी 14 लाख रुपये किंमतीच्या “युनिटी मॉल”चे काम प्रगतीपथावर आहे. बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक “उमेद मॉल” उभारण्याचे शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
-
अनुसुचित जाती घटक कार्यक्रमाच्या तरतुदीत ४२ टक्क्यांची वाढ
अनुसुचित जाती घटक कार्यक्रमाच्या तरतुदीत ४२ टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. याशिवाय आदिवासी घटक कार्यक्रमाच्या यादीत ४० टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. धनगर, गोवारी समाजासाठी २२ कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या.
-
राज्यातील 24 लाख महिलांना लखपती दिदी करणार
दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सुमारे 22 लाख महिलांना “लखपती दिदी” होण्याचा मान मिळाला असून सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट आहे.
-
लेक लाडकी योजनेसाठी 50 कोटींची तरतूद
“लेक लाडकी” योजनेअंतर्गत 1 लाख 13 हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता 50 कोटी 55 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
-
एक तालुका, एक बाजार समिती योजना राज्यभर राबवली जाणार
मुंबई, नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्थापन केली जाईल. याशिवाय एक तालुका, एक बाजार समिती योजना राज्यभर राबवली जाणार आहे.
-
कृषी विभागासाठी ९ हजार ७१० कोटी रुपयांची तरतूद
कृषी विभागासाठी ९ हजार ७१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. अन्न व नागरी पुरवठा विभागाला ५२६ कोटींची तरतूद. जलसंधारण विभागाला ४ हजार २४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये.
-
आवास योजनेतील लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत करणार
राज्यात पंतप्रधान आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. आवास योजनेतील लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत करण्यात येणारे. राज्यासाठी नवं गृहनिर्माण धोरण राबवण्यात येणार. पंतप्रधान सूर्यघर योजनेतून १ लाख ३० हजार घरगुती ग्राहकांनी ५०० मेगावॅट पेक्षा अधिक क्षमतेचे सौर ऊर्जासंच स्थापित केलेत. १ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक अनुदानाचा लाभ देण्यात आलाय.
-
दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांसाठी एक टक्का निधी राखीव
दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती, कृत्रिम अवयव व साधने विकत घेण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य अशा योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1 टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
मराठवाडा वॉटर ग्रीड राबवणार, 37 हजार कोटींचा खर्च
सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी व टेकवडी या गावांना “सौरग्राम” म्हणून घोषित केले असून त्यांच्यासह अन्य 8 गावांचे सौर ऊर्जेद्वारे १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे. आनंदवनच्या अनुदानात वाढ करण्यात येणार आहे.
-
सांगली जिल्ह्यात दीड हजार कोटींचा सौरऊर्जा प्रकल्प
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी 200 मेगावॅट क्षमतेच्या 1 हजार 594 कोटी रुपये किंमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मान्यता
-
ठाणे, रत्नागिरी अन् रायगडमध्ये सुसज्ज रुग्णालये उभारणार
ठाणे येथे 200 खाटांचे, रत्नागिरी जिल्ह्यात १०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय आणि रायगड जिल्ह्यात २०० खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्यात येत आहे.
-
महाराष्ट्र अॅग्री बिजनेस नेटवर्क उभारणार
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क-मॅग्नेट 2.0” हा सुमारे 2100 कोटी रुपयांचा बाह्यसहाय्यित प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
-
27 जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी वीज योजना
ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार. 2 लाख 90129 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत. बी बियाणं यंत्र सामृग्रीसाठी शेत व पाणंद रस्त्याच्या विकासासाठी योजना, रामटेकच्या धर्तीवर विकास. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत २ लाख १३ हजार ६२५ लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी २५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे
-
जलयुक्त शिवार योजना मार्चअखेर पूर्ण करणार
जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 818 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किंमतीची 1 लाख 48 हजार 888 कामे हाती घेण्यात आली आहेत. अभियानातील सर्व कामे मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेत डिसेंबर 7978 कोटींची सवलत देण्यात आली आहे.
-
कालवे वितरण सुधारण्यासाठी 5000 कोटीची कामे मंजूर
जलयुक्त शिवार 2.0 यासाठी 5518 गावात 4227 कोटींची कामंहाती घेण्यात आली आहे. यातील कामं 2026 पर्यंत पूर्ण होतील. राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत.
-
नैसर्गिक शेती अभियानात 2 लाख शेतकऱ्यांसाठी 255 कोटींची तरतूद
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत २ लाख १३ हजार ६२५ लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी २५५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
-
अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांसाठी पात हजार कोटींची तरतूद
राज्यात अपूर्ण असणाऱ्या जलसिंचन प्रकल्पांच्या कामासाठी 5000 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पांची माहिती घेण्यात येत असून त्यासाठी कार्यवाही सुरू आहे.
-
नानाजी देशमुख कृषी संजीवनीचा दुसरा टप्प्यासाठी साडेतीनशे कोटी
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांमध्ये राबविण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये ३५१ कोटी ४२ लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
-
6000 डिझेल बसचं रुपांतर सीएनजी आणि एलएनजीमध्ये करणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 6 हजार डिझेल बसचे रुपांतर सीएनजी आणि एलएनजी बसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी सीएनजी आणि एलएनजीमध्ये करार करणार. महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
-
राज्यात येत्या पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होणार : अजित पवार
उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
- पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे
- तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे
- या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
-
वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित
वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या बंदराजवळ असणार आहे. हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडण्यात येणार आहे.
-
रोजगारासाठी मुंबईत इनोव्हेशन सिटी उभारणार
नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार आहे.
-
साई भक्तांची समस्या मिटणार, शिर्डी विमानतळावर लवकर नाईट लँडिंग
शिर्डी विमानतळाच्या 1 हजार 367 कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली असून ती कामे सुरू आहेत. सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नाईट लँडिगची सुविधाही लवकरच सुरु करण्यात येणार आहे.