मणिपूर, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; राऊतांच्या गंभीर आरोपांनी खळबळ!

मणिपूर, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; राऊतांच्या गंभीर आरोपांनी खळबळ!

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील अस्थिर वातावरणावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर तोफ डागली आहे. मणिपूर, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या सीमांवर दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हरियाणात दंगली झाल्या. मणिपुरात तर अजूनही हिंसाचार सुरू आहे. आता हे लोक महाराष्ट्रात तसं वातावरण तयार व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.

‘देवेंद्रजी हिंमत असेल तर त्या व्यक्तीचं नाव जाहीर करा, अन्यथा’.. ठाकरे गटाच्या खासदाराचं थेट चॅलेंज!

खासदार राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचा प्रयत्न होत आहे. पण महाराष्ट्रात दंगली होणार नाहीत. राज्यातील जनता सूज्ञ आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक, भाजपाचं गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहे. महाराष्ट्रात दंगलींची आग भडकावण्याा प्रयत्न सुरू आहे. परंतु, राज्यातील जनता सूज्ञ आहे. ती अशा विचारांना बळी पडणार नाही. या लोकांनी गुंडांना, भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घातलं आहे. हे फडणवीस ज्यांना तुरुंगात (अजित पवार) पाठवणार होते, चक्की पिसिंगबद्दल बोलत होते ते आता तुमचे मंत्रिमंडळातील सहकारी झाले आहेत. ते तुमच्या खिशात आहेत, हृदयात आहेत.

दरम्यान, राऊतांनी केलेल्या या आरोपांवर अद्याप भाजप नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या आरोपांवर आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तुमचे गुरुजी असतील तर त्यांची पूजा करत बसा

एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत असेल तर सरकारने त्याच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली पाहिजे. ते तुमची गुरुजी (संभाजी भिडे) असतील तर तुम्ही त्यांची पूजा करत बसा, असा टोला राऊत यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube