Maratha Reservation : प्रशासन अलर्ट! आता छत्रपती संभाजीनगरमध्येही संचारबंदी

Maratha Reservation : प्रशासन अलर्ट! आता छत्रपती संभाजीनगरमध्येही संचारबंदी

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता. बीड, धाराशिव पाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे हिंसक घटना टाळण्याच्या उद्देशाने प्रशासनाने या जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार आहे.

Maratha Reservation : आंदोलनाचा भडका! बीडपाठोपाठ धाराशिवमध्येही संचारबंदी

अप्पर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी रात्री याबाबतचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यात आंदोलनांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलने होत आहेत.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले आहे. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आली. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने जळाली. या परिस्थिती जिल्हा प्रशासनाने येथे तत्काळ संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र येथील परिस्थिती नियंत्रणात आल्याने संचारबंदी शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. धारशिवमध्ये मात्र संचारबंदी कायम आहे.

बीडपाठोपाठ धाराशिवमध्येही आंदोलन चिघळले होते. एसटी बसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या वाहनावर हल्ले, लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना वाढल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी खासगी मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विचार करता जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले.

Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीसांना काड्या करायची सवय’; जरांगे पाटलांचा जोरदार निशाणा

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube