‘जातनिहाय जनगणना हाच आरक्षणावरचा पर्याय पण RSS च्या दबावापुढं सरकार झुकलं’

‘जातनिहाय जनगणना हाच आरक्षणावरचा पर्याय पण RSS च्या दबावापुढं सरकार झुकलं’

Nana Patole : राज्यात सध्या ऐरणीवर असलेल्या विविध समाजाच्या आरक्षणावर जातनिहाय जनगणना (Caste wise census) हाय पर्याय आहे. काँग्रेस पक्षाने त्यासंदर्भातील आपली भूमिका सभागृहात मांडली आहे तर आरएसएसचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. संघ व भाजपाला आरक्षणच संपवायचे आहे म्हणून महाराष्ट्रात वाद चिघवळला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत आरक्षणप्रश्नी केलेले भाषण हे भाजपा व आरएसएसने दिलेला ड्राफ्ट होता, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले की, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच पर्याय आहे. शिंदे समितीचे काम फक्त कुणबी प्रणाणपत्र आहे का हे पाहण्याचे काम आहे, ते कायमस्वरुपी काम नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले की अनेक जाती आरक्षण मागत आहेत. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. त्या समाज घटकांना आरक्षण द्यायचे आहे. पण या सर्वांवरचा एकच पर्याय आहे तो म्हणजे जातनिहाय जनगणना. सरकारने जातनिहाय जनगणना करावी म्हणजे सर्वांना न्याय मिळेल. महाराष्ट्रात समाज-सामाजात लावलेली आगही थांबेल, असे त्यांनी म्हटले.

भाजप आमदाराची मागणी, जयंत पाटलांचे आव्हान अन् फडणवीसांनी केली मोठी घोषणा

कांदा प्रश्नावर राज्य सरकारचा देखावा…
नाना पटोले म्हणाले की, आता शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला आहे. हे दिल्लीला जाऊन काय करणार? हे सरकार इतके दिवस काय करत होते? राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा कांदा चार-पाच दिवस गाड्यात पडून राहिला, कांदा खराब झाला, त्याचे नुकसान कोण देणार? हे सरकार शेतकरी विरोधी आहे. कांद्याच्या प्रश्नासाठी दिल्ली भेट हा केवळ देखावा आहे. मुंबईतील मोठा हिरे व्यापार सुरतला नेला आहे. आणखी काही उद्योग गुजरातला पळवून नेता येतील का? यासाठी केंद्रातील गुजरात लॉबीचा प्रयत्न असेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube