कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना चिरडले

कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना चिरडले

Kolhapur accident : पुण्यात पोर्श कार अपघातामुळे संपूर्ण देश हादरलेला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. अशातच आता कोल्हापूरात देखील असाच एक भीषण अपघात (Kolhapur accident) झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या एका कारनं सायबर चौकात चार-पाच दुचाकींना धडक दिली. या धडकेत तीन जणाचा मृत्यू झाला.

कन्याकुमारीच्या उगवत्या सूर्याने विचारांना नवी उंची; निकालाच्या एक दिवस आधी PM मोदींची पोस्ट 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या सायबर चौकात हा भीषण अपघात झाला. नेहमीप्रमाणे या चौकात वाहतूक सुरू असताना अचानक एक भरधाव कारनं राजारामपुरीकडून येतांना बरोबर चौकामध्येच एकमेकांना क्रॉस होणाऱ्या काही दुचाकींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, काही लोक हे हवेत उडाल्याचं दिसून आलं. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जणं जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कन्याकुमारीच्या उगवत्या सूर्याने विचारांना नवी उंची; निकालाच्या एक दिवस आधी PM मोदींची पोस्ट 

या भीषण अपघातामुळं पाहणाऱ्यांच्या अंगावर देखील शहारे आले. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी पंचनामा करून कार चालकाविरुध्द गुन्हा नोंदवला आहे. गंभीर जखमी असलेल्यांवर सीटी हॉस्पिटल आणि सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सायबर चौक हा राजारामपुरी, शिवाजी विद्यापीठ आणि राजाराम कॉलेजला जोडतो आणि या चौकात मोठी गर्दी असते. या चौकात अनेक शाळा आणि सायबर कॉलेज आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज