राज्य सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजेने’चे पैसे बंद
अंतिम पडताळणीपूर्वी राज्य सरकारला या योजनेसाठी 3 हजार 600 कोटी रुपये खर्च येत होता.
लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची (Ladki Bahin Yojana) सर्वात यशस्वी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. अशातच आता लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. लाखो लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम पडताळणी एप्रिल अखेर पूर्ण झाली. यात अपात्र ठरलेला महिलांना आता निधी मिळणार नाही.
लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र या योजनेचा लाभ काही अपात्र महिलाही घेत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे सरकारने अशा महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या योजनेची अंतिम पडताळणी एप्रिल अखेर पूर्ण झाली होती. अंतिम पडताळणी नंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आता या महिलांना आगामी हप्ता मिळणार नाही.
मुख्यमंत्री फडणवीसांचं बजेट ; लाडकी बहिण, स्टार्टअप्स आणि रोजगारासाठी मोठ्या घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतरचे आकडे आता समोर आले आहेत. 66 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर आता राज्यात फक्त 1 कोटी 77 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता या महिलांनाच 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. आता 66 कोटी महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र अपात्र असताना लाभ घेतलेल्या या महिलांवर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे काही प्रमाणात या महिलांना दिलासा मिळणार आहे.
अंतिम पडताळणीपूर्वी राज्य सरकारला या योजनेसाठी 3 हजार 600 कोटी रुपये खर्च येत होता. मात्र आता तब्बल 66 लाख महिला अपात्र ठरल्यामुळे महिन्याला आता या योजनेवर 2 हजार 655 कोटी खर्च होणार आहेत. या पडताळणीनंतर सरकारचे वर्षाला 1 हजार कोटी रुपये वाचणार आहेत. याचाच अर्थ या पडताळणीनंतर आता सरकारला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. मात्र यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरली आहे.