दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील मतदान केंद्रावर घोळ! मतदार यादीत मृतांची नावे, हयात व्यक्तींची नावे गायब…

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील मतदान केंद्रावर घोळ! मतदार यादीत मृतांची नावे, हयात व्यक्तींची नावे गायब…

मुंबई : मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघासह (Lok Sabha Elections) राज्यातील 13 मतदारसंघात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मुंबईकरांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जातो? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच आता दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील बालमोहन विद्यामंदिर या मतदान केंद्रावर मतदार यादीतून मागील वर्षानुवर्ष मतदान करणाऱ्या मतदारांची नावे गायब (Names of voters missing) असल्याचं समोर येत आहे.

TISS नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ रिक्त पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज? 

‘निवडणूक आयोग मतदार जनजागृतीसाठी हजारो कोटी रुपये खर्च करतं. मात्र, मतदानाच्या दिवशी मतदारांची नावेच यादीतून गायब असतात’, असा आरोप मतदारांनी केला आहे.

झालंय असं की, मागील वर्षानुवर्ष दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथील मतदान केंद्रावर मतदान करणारे अजय कोंडेकर (Ajay Kondekar) हे मागील काही वर्षापासून ठाण्याच्या घोडबंदर येथे राहत आहेत. 17 वर्षांपूर्वी ते दादर प्लाझा जवळ मोहसीन या नावाने एक इमारत होती, तिथे राहत होते. ही इमारत पुनर्बांधणीसाठी पाडण्यात आली. या इमारतीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सध्या अजय हे ठाण्यातील कासारवडवली घोडबंदर येथे राहत आहेत. मात्र, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, अजय आपल्या कुटुंबासह बालमोहन येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी येतात.

Gullak 4 OTT : ‘गुलक सीझन 4’ आता ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहता येणार… 

अजय यांनी सांगितले की, मी प्रत्येक निवडणुकीला याच मतदान केंद्रावर मतदान करत आलो आहे. मात्र, मी जेव्हा मतदानासाठी आत गेलो, तेव्हा तुमचं नाव यादीत नाही, असं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मग मी इतरांची नाव तपासली तेव्हा, माझ्या शेजाऱ्यांचीही नावे यादीत नसल्याचं निदर्शनास आलं. काहींची नावे या यादीतून गहाळ झाल्याचे समोर आलं. यात धक्कादायक बाब म्हणजे, आम्ही जे जिवंत लोक आहोत त्यांची नावं या मतदार यादीत नाहीत. मात्र, आमच्या सोसायटीतील जे लोक आता मृत झालेत, त्यांची नावे मात्र या मतदार यादीत आम्हाला पाहायला मिळाली. ही माझी एकट्याची तक्रार नाही. माझे आणखी काही रहिवासी साथीदार होते. त्यांचं देखील नाव या मतदार यादीत नाही.

मतदान हा आमचा हक्क अधिकार आहे. या अधिकारापासून आम्हाला जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे. याला सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार आहे. आम्ही सामान्य माणसं आहोत. आम्ही यापुढे जाऊन काय करू शकतो? त्यामुळे माझा थेट प्रशासनावर आरोप आहे की निवडणूक आयोगाकडून आम्हाला मतदानापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे, अशा शब्दात अजय कोंडेकर यांनी आपला संताप व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज