Mohan Bhagwat: जाती ईश्वराने नव्हे तर पंडितांनी निर्माण केल्या

Mohan Bhagwat: जाती ईश्वराने नव्हे तर पंडितांनी निर्माण केल्या

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी जातीवादावर मोठे विधान केले आहे. भागवत म्हणाले की, जात ही देवाने नाही तर पंडितांनी निर्माण केली आहे. रविदास जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भागवतांनी हे विधान केले आहे.

जेव्हा आपण उपजीविका करतो, तेव्हा समाजाप्रती आपली जबाबदारी असते. जेव्हा प्रत्येक काम समाजासाठी असते तेव्हा कोणतेही काम छोटे-मोठे कसे असू शकते. देवाने नेहमीच सांगितले आहे की त्याच्यासाठी सर्वजण समान आहेत. कोणतीही जात किंवा वर्ण नाही, त्यासाठी कोणताही संप्रदाय नाही, तो पंडितांनी निर्माण केला आहे जे चुकीचे आहे.

यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, आमच्या समाजाच्या विभाजनाचा फायदा इतरांनी घेतला. त्यामुळेच देशावर हल्ला झाला. त्यामुळेच बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांनीही आपल्या देशावर राज्य केले. मोहन भागवत यांनी हिंदू समाजाला विचारले की, देशात हिंदू समाज नष्ट होण्याची भीती दिसत आहे का? कोणताही ब्राह्मण तुम्हाला हे सांगू शकत नाही. तुम्हीच समजून घेतले पाहिजे.

भागवत म्हणाले की, काशी मंदिर पाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून ‘हिंदू-मुस्लिम सर्व एकाच देवाची मुले आहेत’ असे म्हटले होते. तुमच्या राजवटीत एकाचा छळ होत आहे, ते चुकीचे आहे. प्रत्येकाचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. हे थांबले नाही तर तलवारीने उत्तर देऊ असे भागवत म्हणाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube