Delhi Murder Case : क्रूरपणे हत्या केल्यानंतर आरोपी साहिलचं धक्कादायक विधान, म्हणाला…

Delhi Murder Case : क्रूरपणे हत्या केल्यानंतर आरोपी साहिलचं धक्कादायक विधान, म्हणाला…

Delhi Murder Case : मला साक्षीच्या हत्येचा कोणताही पश्चाताप झाला नसल्याचं धक्कादायक विधान आरोपी साहिलने केलं आहे. दिल्लीच्या शाहबाद इथं घडलेल्या क्रूर हत्येनंतर आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून अटक केली. साहिलला अटक केल्यानंतर चौकशीअंती त्याने हे धक्कादायक विधान केलं आहे. यासोबतच हत्येमागील अनेक खुलासेदेखील झाले आहे.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती, 700 हून अधिक जागांसाठी नोटिफिकेशन जारी, 81 हजार महिन्याला पगार

आरोपी साहिलने प्रेयसी साक्षीच्या हत्येसाठी मागील 15 दिवसांपासून तयारी करीत होता. त्याने दिल्लीच्या आठवडे बाजारातून तिची हत्या करण्यासाठी चाकू विकत घेतला होता. त्याने हा चाकू नेमकं कुठून विकत घेतला होता? याबाबत अद्याप साहिलने तोंड उघडले नाही. पोलिसांच्या तपासात साहिलने ही माहिती उघड केली आहे.

कोल्हापूरात येत्या दोन महिन्यांत दंगली घडविण्याचे कारस्थान; सतेज पाटलांच्या दाव्याने खळबळ

अद्यापही साहिलची चौकशी सुरुच असून पोलिस सर्वच बाजूने या हत्याकांडाचा तपास करीत आहेत. साक्षीची हत्या साहिलने वादावरुन केली की हत्येमागे आणखी कोणी आहे? याची कसून चौकशी पोलिस करत आहेत. दिल्लीच राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीची तिच्याच प्रियकराने 40 वेळा चाकून वार करत निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र या दोघांचे भांडण झाले होते. राजधानी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, या घटनेनंत संपूर्ण देश हादरुन गेला असून या सर्वत्र या घटनेचा नोंदवण्यात येत आहे. हत्या केल्यानंतर आरोपी साहिलने आपला फोन बंंद करुन पलायन केलं होतं. मात्र, पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली. आज कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube