Ahmedabad Plane Crash म्हणजे एअर इंडियासाठी काळा दिवस! एक्सवरील डीपी हटवत शोक व्यक्त

Ahmedabad Plane Crash म्हणजे एअर इंडियासाठी काळा दिवस! एक्सवरील डीपी हटवत शोक व्यक्त

Ahmedabad Plane Crash is a black day for Air India! Expresses condolences by removing DP on X : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले (Ahmedabad Plane Crash) असून या विमानात 242 लोक होते अशी माहिती समोर आली आहे. अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानीनगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे. माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. तर दुसरीकडे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) देखील असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात म्हणजे एअर इंडियासाठी काळा दिवस ठरला आहे. त्यावर आता एअर इंडायाने शोक व्यक्त केला आहे.

एक्सवरील डीपी हटवत शोक व्यक्त

गुजरातच्या अहमदाबादमध्ये (Ahmedabad Plane Crash) एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाल्यानंतर सगळीकडे गोंधळाचे आणि घबराहटीचे वातावरण पसरले आहे. या सर्वामध्ये नेमक्या किती प्रवाशांचा मृत्यू झाला आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. आता या अपघातावर एअर इंडायाने शोक व्यक्त केला आहे. एअर इंडीयाच्या एक्स या सोशलल मिडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंटचा डीपी हटवण्यात आला आहे. त्याऐवजी आता ब्लॅक इमेज दिसत आहे. काळा रंग म्हणजे दु:खाचं प्रतिक मानला जातो. ज्याद्वारे एअर इंडायाने शोक व्यक्त केला आहे.

Video : BJ मेडिकल कॉलेजवर कोसळलं विमान; जेवतानाचं विद्यार्थांवर काळाचा घाला, अनेकांचा मृत्यू

दरम्यान या घटनेवर एअर इंडीयाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, मी अत्यंत दु:खाने सांगत आहे की, एअर इंडीयाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान हे अहमदाबादहून (Ahmedabad Plane Crash) लंडनाला जात असताना अपघात ग्रस्त झालं आहे.आमच्या संवेदना या अपघातामध्ये प्रभावित झालेल्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत आहेत. त्यांना मदत करण्यावर आता आमचं लक्ष आहे. त्याबद्दल अधिक माहिती आल्यावर ती आम्ही पोहचवू.

Ahmedabad Plane Crash मध्ये परदेशी नागरिकांसह 169 भारतीयांचा समावेश; पायलटनेही दिला होता संदेश

एअर इंडियाचे विमान कसं कोसळले?

फ्लाइट एआय 171 अहमदाबादहून (Ahmedabad Plane Crash) लंडनला जात होती. अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळ हा अपघात झाला. विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. एअर इंडियाचे विमान टेक-ऑफ दरम्यान कोसळले. बोईंग विमानाने आधी पेट घेतला आणि नंतर कोसळलं. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याने अपघात झाला असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचं देखील सांगितलं जातंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube