धक्कादायक! पाकिस्तानी महिलांच्या नावाचे मतदार ओळखपत्र; ‘या’ राज्यात उडाली खळबळ!

धक्कादायक! पाकिस्तानी महिलांच्या नावाचे मतदार ओळखपत्र; ‘या’ राज्यात उडाली खळबळ!

Bihar News : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम (Bihar Elections 2025) सुरू आहे. यातच राज्यात स्पेशल इंटेंसिव रिवीजन (SIR) सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. भागलपूर जिल्ह्यात दोन पाकिस्तानी महिलांची नावे मतदार ओळखपत्र जारी झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या तपासात हा प्रकार समोर आला आहे.

गृह मंत्रालयाच्या टीमने व्हीजाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान भागलपूरमध्ये तीन पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. यातील दोन महिला होत्या. गृह मंत्रालयाचा रिपोर्ट समोर आल्यानंतर पोलीस मुख्यालयाने एसएसपीकडे या प्रकरणाचा तपास सोपवला. यानंतर सखोल तपास केल्यानंतर या पाकिस्तानी महिलांचे मतदान ओळखपत्र देखील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

Bihar : वोटर लिस्टमधून वगळलेल्या 65 लाख मतदारांची माहिती सादर करा; SC चा निवडणूक आयोगाला आदेश

या प्रकाराने प्रशासनात मोठी खळबळ उडाली. स्पेशल ब्रँचच्या पोलीस अधीक्षकांनी भागलपुरचे जिल्हाधिकारी डॉ. नवलकिशोर चौधरी आणि एसएसपी यांना तपास अहवाल मागवला आहे. आता या दोन्ही पाकिस्तानी महिलांचे नाव मतदार यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

कोण आहेत पाकिस्तानी नागरिक

रिपोर्टनुसार सध्या रंगपूर येथे राहणारी पाकिस्तानी महिला 19 जानेवारी 1956 मध्ये भारतात आली होती. तिचे नाव फिरदौसिया खानम असे आहे. दुसरी महिला इमराना खानम उर्फ इमराना खातून सुद्धा तीन वर्षांचा व्हिजा घेऊन भारतात आली होती. या दोघींव्यतिरिक्त आणखी एक पाकिस्तानी नागरिक 24 मे 2002 रोजी दोन वर्षांचा व्हिजावर भारतात आला होता. या व्यक्तीने सुद्धा भारतातील आधारकार्ड तयार करून घेतले आहे.

हे तिन्ही पाकिस्तानी नागरिक अनेक वर्षांपासून भारतात राहत होते. व्हिजाची मुदत संपल्यानंतरही त्यांनी येथेच राहणे पसंत केले. आता घुसखोर नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना तत्काळ पाकिस्तानात पाठवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या लोकांनी येथे राहून मतदान ओळखपत्र, आधारकार्ड कसे तयार केले? भारतीय नागरिक नसताना त्यांच्याकडे भारतातील कागदपत्रे कुठून आली? त्यांना कुणी मदत केली? यात स्थानिक नागरिकांचीही मदत झाली का? याचाही तपास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. या घुसखोरांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण होत आहे.

1 कोटी रुपये दंड अन् 3 वर्षांचा तुरुंगवास…, ऑनलाइन गेमिंग विधेयक राज्यसभेत मंजूर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube