आता भाजपही कंगनावर नाराज, शेतकरी आंदोलनावरील वक्तव्यावरून झापले

  • Written By: Published:
आता भाजपही  कंगनावर नाराज, शेतकरी आंदोलनावरील वक्तव्यावरून झापले

नवी दिल्ली :  मंडीतील लोकसभा खासदार कंगना रणौतने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपने कंगनाला पुन्हा असे विधान कराल तर, खबरदार असा सल्ला देत फटरालं आहे. याबाबत भाजपने एक निवेदन जारी करून कंगनाला भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला आहे. शेतकरी आंदोलनात बलात्कारासारख्या घटना घडत असल्याचे कंगना राणौतने (Kangana Ranaut) म्हटले होते. एवढेच नव्हे तर, आंदोलनादरम्यान हिंसाचार होत असल्याचेही कंगना म्हणाली होती. या वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता भाजपनं एक निवेदन जारी करत कंगनाला मोलाचा सल्ला दिला आहे. (BJO On Kangana Ranaut Statement Over Farmer Protest)

भाजपनं जारी केलेल्या निवेदनात काय?

कंगनाने केलेल्या विधानानंतर तिच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठवण्यात येत होती. त्यानंतर आता याबाबत भाजपकडून (BJP) एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ज्यात भाजप खासदार कंगना राणौत यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात केलेले विधान हे पक्षाचे मत नसल्याचे तसेच केलेल्या विधानाशी असहमत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. शिवाय कंगना रणौत यांना धोरणात्मक मुद्द्यांवर बोलण्याचा अधिकार नसल्याचे नमुद करत भविष्यात त्यांनी अशा प्रकारची विधाने न करण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यातील शालेय शिक्षकांना मोठा दिलासा; अशैक्षणिक कामे करणे बंधनकारक नाही; GR निघाला

काय म्हणाली होती कंगना?

दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप कंगनाने केला आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत तिने हा दावा केला होता. एवढेच नव्हे तर, आंदोलनाच्या त्याठिकाणी बलात्कार आणि अनेकांच्या हत्यादेखील झाल्याचे कंगाना मुलाखतीवेळी म्हणाली होती. तसेच केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर, देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या.

Video : हे मला काढायला ठेवलं का?, नव्या इमारतीच्या पायरीवर पाय ठेवताच अजितदादा भडकले

संजय राऊतांचा कंगनाशी ‘पंगा’

कंगनाच्या या दाव्यानंतर राजकीय स्तरातून यावर प्रतिक्रिया समोर आल्या. यात उबाठा गटाचे खासदार यांनी कंगानाशी पंगा घेतला. ते म्हणाले की, कंगनाला तुम्ही फार मनावर घेऊ नका, आम्हीही तिला फार गांभीर्याने घेत नाही. शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले हे जे वक्तव्य आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी कंगनाचे रितसर स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि मग आम्ही पार्लमेंटमध्ये यावर चर्चा करू असे राऊतांनी म्हटले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube