Chhattisgarh Election : ‘इंडिया’ला धक्का! ‘आप’ने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

Chhattisgarh Election : ‘इंडिया’ला धक्का! ‘आप’ने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

Chhattisgarh Election : केंद्रातील भाजप सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी (INDIA Alliance) स्थापन केली. या आघाडीच्या तीन बैठका झाल्या. आघाडी अभेद्यच आहे आणि पूर्ण ताकदीने भाजपला (BJP) टक्कर देणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, या विरोधकांची आघाडी किती तकलादू आहे हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. दिल्ली आणि पंजाबातील सत्ताधारी आम आदमी पार्टीने (AAP) राजस्थान, पंजाबनंतर आता छत्तीसगडमध्येही (Chhattisgarh Election) इंडिया आघाडीला जोरदार झटका दिला आहे.

‘इंडिया’त मिठाचा खडा! ‘या’ राज्यात काँग्रेसशी आघाडी नाही; ‘आप’ स्वबळावरच लढणार

या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुका (Chhattisgarh Election) होणार आहेत. या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनेही तयारी सुरू केली आहे. पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत. इंडिया आघाडीत सहभागी असतानाही छत्तीसगड राज्यात निवडणूक लढण्याच्या इराद्याने आम आदमी पार्टीने तयारी सुरू केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्ली आणि पंजाबनंतर आपने छत्तीसगडवर (Chhattisgarh Election) लक्ष केंद्रीत केले आहे. येथे सध्या काँग्रेस सत्तेत आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. पण, जर आम आदमी पार्टीने उमेदवार दिले काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सरळ लढत राहणार नाही. याआधी बसपानेही 9 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यानंतर भाजपने 17 ऑगस्ट रोजी भाजपने 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस आज किंवा उद्या (रविवार) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करेल अशी शक्यता आहे.

राजस्थानातही आप काँग्रेसला झटका देणार ?

दरम्यान, दिल्लीतील निवडणुकीवरूनही केजरीवाल आणि काँग्रेसमध्ये खटके उडाले आहेत. पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनीही केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात केजरीवालांना पाठिंबा देण्यास विरोध दर्शवला होता. दिल्लीतील लोकसभा मतदारसंघांच्या मुद्द्यावरून हा वाद वाढला होता. त्यात आता राजस्थानची भर पडली आहे. मध्यप्रदेशातही आप स्वतंत्र लढण्याच्या दिशेने तयारी करत आहे. असे जर घडले तर याचा फटका इंडिया आघाडीला निश्चित बसेल. तसेच आघाडीतील अन्य पक्षांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

BJP : बंगालमध्ये भाजपला धक्का! नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांची पक्षाला सोडचिठ्ठी

‘आप’ इंडिया (INDIA) आघाडी सोडून राजस्थानात (Rajasthan Election) स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. पक्षाचे राजस्थान प्रभारी विनय मिश्रा यांनीच काही दिवसांपूर्वी दिली होती. राजस्थान विधानसभेच्या जागा अ,ब आणि क अशा तीन भागात विभागल्या आहेत. अ श्रेणीत पक्षाचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरतील. ब श्रेणीत जिथे तयारी आहे पण, उमेदवारांबाबत संभ्रम आहे आणि क श्रेणीत आतापर्यंत एकही उमेदवार समोर आलेला नाही, अशी माहिती मिश्रा यांनी दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube