Ahmedabad plane crash नंतर विमा कंपन्यांना द्यावे लागणार तब्बल 1 हजार कोटी! विमान अपघातील आतापर्यंतचा सर्वात मोठा क्लेम

Insurance companies will pay whopping Rs 1,000 crore after Ahmedabad plane crash biggest claim ever in plane crash : संपूर्ण देशासाठी 12 जून हा काळा दिवस ठरला आहे. अहमदाबादमध्ये (Ahmedabad plane crash) एका विमानाचा अपघात झाला अन् क्षणात सगळं काही होत्याचं (Ahmedabad Plane Crash) नव्हतं झालं. विमानातील एकूण 265 लोकांच्या मृत्यूने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. अपघातनंतर आता विमा कंपन्यांना मोठी रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागणार आहे. ही रक्कम आतापर्यंतच्या विमान अपघातांच्या इतिहासातील सर्वांत मोठी विमा रक्कम असणार आहे.
मोठी बातमी : राजकारणात भाकरी फिरणार; शिंदे अन् अजितदादांना पवारांच्या पक्षाकडून टाळीचे संकेत
विमान अपघातील आतापर्यंतचा सर्वात मोठा क्लेम!
अहमदाबाद (Ahmedabad plane crash) विमान अपघाताचा विमा कंपन्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. हा भारतातील सर्वांत महागडा विमान क्षेत्रातील इन्शुरन्स क्लेम असणार आहे. तज्ज्ञांच्या नुसार या अपघातासाठी विमा कंपन्यांना तब्बल 120 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 1 हजार कोटी रूपये द्यावे लागणार आहेत.
‘मृतदेह लवकर मिळावा…’ अहमदाबाद विमान अपघातात पुण्याच्या इरफानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
इकॉनॉमिक्स टाईम्सनुसार या क्लेमची (Ahmedabad plane crash) रक्कम जवळपास 80 मिलियन डॉलर असू शकते. यामध्ये विमानाची किंमत मात्र हल लॉसमध्ये जाते. कारण हे विमान आता पुन्हा बांधण्यासाठी अर्थिक मदत दिली जाऊ शकत नाही. मात्र प्रवाशांना देण्यासाठी 30 ते 50 डॉलर लागतील. काहींच्या मते हे क्लेम 100 मिलियन डॉलरपेक्षाही जास्त असू शकतात. कारण विमानात अनेक गर्भ श्रीमंत लोक होते.
या कंपन्यांचा समावेश
या अपघातामध्ये (Ahmedabad plane crash) क्लेम चुकता करावा लागणाऱ्या कंपन्यांमध्ये मुख्य कंपनी होती ती टाटा एआयटी, त्यानंतर न्यू इंडिया इन्शुरन्ससह इतर देखील कंपन्या यामध्ये सहभागी आहेत. तर या विमानाचा विमा लंडनच्या विमा बाजारात उतरवण्यात आला होता. ज्याला ग्लोबल रीइन्शुरन्स प्रोग्राम म्हटलं जात.ज्याची जास्त जोखीम ही परदेशी विमा कंपन्यांची असते.
Israel Iran Conflict: इस्रायली हल्ल्यानंतर इराणने दिले प्रत्युत्तर ; इस्रायलवर 100 ड्रोन डागले
दरम्यान भारतीय विमा कंपन्या जसे टाटा एआयटी, न्यू इंडिया इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया, ओरिएंटल आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल यांनी 10 टक्क्यांहून कमी जोखीम ठेवली आहे. तर सरकारी रीइन्शुरन्स कंपनी जाआयसी रे कडे रीइन्शुरन्सचे 5 टक्के दिले जातात. यावर जाआयसी रेचे सीएमडी रामस्वामी नारायण यांनी सांगितल की, या घटनेमध्ये पूर्ण विमान नष्ट झाल्याचा आणि लोकांचे मृत्यू झाल्याचे दावे केले जातील. ज्याचा परिणाम अनेक रीइन्शुरन्स कंपन्यांवर पडू शकतो. कारण विमान ताफ्याचे धोरण अनेकदा अनेक कंपन्यांशी शेअर केले जातात. या इन्शुरन्स क्लेमचा विम्याच्या किंमतींवर काही परिणाम होणार का? हे आताच सांगणे कठिण आहे.
या पुर्वीच्या अपघातांमध्ये असे दिले क्लेम
पुर्वी भारतात विमान अपघात कमी होत होते. त्यात 2010 च्या दुबईला चाललेल्या बोईंग 737 विमान मंगलोरमध्ये उतरताना अपघात झाला होता. त्यात 158 लोकांचा मृत्यू झाला होता.तर 2020 मध्ये कोझीकोडमध्ये झालेल्या एका अपघातात 21 मृत्यू झाले होते.या घटनांमध्ये विमा कंपन्यांनी जवळपास 60-70 मिलियन डॉलर क्लेम देऊ केला होता. यामध्ये विमानाची किंमत आणि प्रवाशांचा क्लेम समाविष्ट होता.