पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं सोलापुरातील राहत्या घरी निधन झालं आहे.
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलमधील 12 संचालक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे.
राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली.
सांगलीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
माजी आमदार तुकाराम सुर्वे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश.
कोल्हापुरातील मदरशामध्ये अल्पवयीन मुलाने सहकारी मित्राच्या तोंडात बोळा कोंबून, हातपाय वायरीने बांधून शॉक देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.