भारत-पाक युद्धात आम्ही कुणाची मध्यस्थी स्वीकारली नाही; पीएम मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावलं

भारत-पाक युद्धात आम्ही कुणाची मध्यस्थी स्वीकारली नाही; पीएम मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावलं

PM Modi and Trump Phon Call : जी ७ शिखर परिषदे दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान फोनवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 35 मिनिटे चर्चा झाली. (Modi) या चर्चेदरम्यान भारताने कोणाची मध्यस्थी स्वीकारली नाही. ती स्वीकारत नाही आणि भविष्यातही ती स्वीकारणार नसल्याचे खडेबोल सुनावले.

ट्रम्प यांनी दावा केला होता की भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावात त्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्धविरामावर शिक्कामोर्तब केले. आपल्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याचा ट्रम्प यांच्या दाव्याची मोदींनी हवाच काढून टाकली. ट्रम्प हे दोन्ही देशातील शांततेचे श्रेय लाटले होते.

भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबवला तसा इराण-इस्रायलचाही थांबवू; काय म्हणाले ट्रम्प?

ट्रम्प यांच्या दाव्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला केला चढवला होता. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांच्यासमोर झुकल्याचा दावा केला होता. मोदी सरेंडर झाल्याची विखारी टिप्पणी सुद्धा गांधी यांनी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती ट्रम्प यांच्यात कॅनाडामधील G7 समिट मध्ये भेट आणि चर्चा होणार होती. पण इस्त्रायल आणि इराण यांच्या तणावामुळे ट्रम्प यांनी हा दौरा आटोपता घेतला. ते अमेरिकेला रवाना झाले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये भेट होऊ शकली नाही. त्यानंतर ट्रम्प यांच्या आग्रहावरून दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून संवाद झाला.

ही चर्चा 35 मिनिटे चालली. 22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राष्ट्रपती ट्रम्प यांनी फोनवरून पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करून संवदेना व्यक्त केली होती. तर दहशतवादाविरोधात भारताला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube