Good News : वर्षभरात देशातील सर्व टोलनाके बंद होणार; गडकरींची संसदेत मोठी घोषणा….
टोल वसुलीच्या लांबच लांब रांगांपासून होणार सुटका; केंद्र सरकार लवकरच वर्षभरात सुरू करणार नवी टोल वसुली प्रणाली.
Nitin Gadkari Ends Toll Collection Process In India : पुढच्या एका वर्षात तुम्हाला कुठेही टोल दिसणार नाहीत. त्याचप्रमाणे टोलच्या मोठ्या रांगेत उभं राहण्याची देखील गरज पडणार नाही. यासाठी केंद्र सरकार (Central Government) एका विशेष प्रणालीवर काम करत आहे. ही प्रणाली देशभरात लागू झाल्यानंतर कोणत्याही वाहनाला टोल बुथवर पैसे भरण्यासाठी लांबच-लांब रांगेत उभा राहण्याची गरज पडणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या योजनेबाबत लोकसभेत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, पुढच्या वर्षभरात टोल वसुलीची (Toll Collection) प्रणाली संपूर्ण बदलली जाईल. आता टोल हा फक्त इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे स्वीकारला जाणार आहे. याचा वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे.
तलाठ्याची गरज संपली, डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवणार
गुरुवारी म्हणजेचं आज हिवाळी अधिवेशनात लोकसभेत (Loksabha) बोलताना गडकरी म्हणाले की, नवीन प्रणाली 10 ठिकाणांहून सुरू करण्यात आली आहे आणि पुढील एका वर्षात ती संपूर्ण देशात विस्तारित केली जाईल. यामुळे सध्याची टोल व्यवस्था पूर्णपणे बंद होईल, असे ते म्हणाले. टोलच्या नावाखाली तुम्हाला कोणीही रोखणार नाही. एका वर्षाच्या आत, ‘इलेक्ट्रॉनिक टोल वसुली’ देशभरात लागू केली जाईल. गडकरी म्हणाले की, सध्या देशभरात 10 लाख कोटी रुपयांचे 4500 महामार्ग प्रकल्प सुरू आहेत.
📍नई दिल्ली | लोक सभा
सांसद श्री @MPDharmendraYdv जी द्वारा आजमगढ़ – वाराणसी हाईवे पर टोल के संबंध में पूछे गए प्रश्न का केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी द्वारा उत्तर। #QuestionHour #लोकसभा #WinterSession pic.twitter.com/xOTEhoxbcf
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) December 4, 2025
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल वसुली कार्यक्रम विकसित केला आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला. या सवलतीअंतर्गत, असे म्हटले गेले होते की जर एखाद्या वाहनाकडे फास्टॅग नसेल किंवा ते काम करत नसेल तर टोल प्लाझावर दुप्पट रोख कर देण्याऐवजी त्याला टोल टॅक्सच्या केवळ 1.25 पट रक्कम भरावी लागेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन प्रणाली 15 नोव्हेंबरपासून देशभरातील टोल नाक्यांवर लागू करण्यात आली आहे.
