अर्धसत्य तोंडावर आले, गुगली टाकून पूर्णसत्य बाहेर आणणार ! फडणवीसांचे शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

  • Written By: Published:
अर्धसत्य तोंडावर आले, गुगली टाकून पूर्णसत्य बाहेर आणणार ! फडणवीसांचे शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadanvis On Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यात जोरदार जुंपली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला आहे. त्याला शरद पवारांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. मी जर त्यांना फसवले असे त्याचे म्हणणे आहे. तर तुम्ही का फसलात असा खोचक सवाल पवारांनी फडणवीसांना केला आहे. तसेच सत्तेशिवाय ज्यांना करमत नव्हते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हते तर राज्यातील नेते होते, असा टोलाही पवारांना लगावला आहे. त्याला आता देवेंद्र फडणवीसांना जोरदार उत्तर दिले आहे.(Devendra Fadnavis’s reply to Sharad Pawar)

फडणवीस म्हणाले. शरद पवारांच्या तोंडी मी सत्य आणले याचा मला मोठा आनंद झाला आहे. परंतु हे अर्धच सत्य आहे. पवारांनी पूर्ण सत्य सांगितले नाही. मी गुगली फेकून पूर्ण सत्य बाहेर आणणार आहे. यातून मी बोल्ड झालेलो नाही. त्यांनी त्यांच्या पुतण्यालाच बोल्ड केले आहे. अजित पवारांना पुढे करुन त्यांनी त्यांची अडचण केल्याचा टोलाही फडणवीसांना लगावला आहे.

Sharad Pawar : …तर मी मोदींसाठी मैदानात उतरणार; पवारांचा मास्टर स्ट्रोक

काय म्हणाले होते फडणवीस ?

2019 च्या विधानसभा निवडणुक निकालानंतर उद्धव ठाकरे आमचे फोन घेत नव्हते. तेव्हा आम्ही दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केली. तेव्हा शरद पवार यांच्यासोबत आमची बैठकी झाली होती. त्याबैठकीमध्ये महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी सरकार बनविणार याचा निर्णय झाला. अजित पवार आणि मी आम्ही दोघे मिळून हे सरकार बनवू याचा निर्णय झाला. सर्व अधिकार आम्हाला दोघांना देण्यात आले. एवढी सगळी तयारी झाल्यावर एका वेळेवर शरद पवार यातून बाजूला झाले. त्यावेळी अजित पवारांना माझ्यासोबत येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. कारण आम्ही सरकार स्थापन करण्याची सर्व तयारी केली होती. अजित पवार जर सोबत आले नसते तर ते एक्सपोज झाले असते.

Sharad Pawar: …म्हणून काही खेळी खेळल्या; डबल गेमच्या आरोपांवर पवारांचा पलटवार


शरद पवारांचे काय उत्तर ?

फडणवीस यांनी काल स्वत: सांगितले की, भाजपसोबत सरकार स्थापन न करण्याच मत मी दोन दिवस आधी बदलले. जर मी माझं धोरण बदलले होते तर त्याच्यानंतर दोन दिवसांनी फडणवीसांनी अजित पवारांसोबत शपथ घेण्याच काय कारण होतं? तसेच ती शपथ जर घ्यायची होती तर ती अशी पहाटे चोरून का घेतली. शपथ घेतल्यानंतर जर माझा त्या सरकारला पाठिंबा होता तर ते सरकार तिथे राहिले का? दोन दिवसात त्यांचे सरकार गेले. याचा सरळ अर्थ आहे की, सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही त्यांची गोष्ट समाजासमोर यावी याकरिता काही गोष्टी केल्या, असे पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube