वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही; चंद्रहार पाटलांच्या प्रवेशावेळी शिंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde on Udhhav Thackary at Chandrhar Patil Join to Shinde Group : लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीत ज्यांच्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात संघर्ष झाला तेच चंद्रहार पाटील यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रहार पाटील यांच्या हाती शिवसेनेचा झेंडा दिला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
ज्याप्रमाणे चंद्रहार पाटील म्हणाले की, ठाकरे गटामध्ये त्यांना एक शेतकऱ्याचा मुलगा असल्याने, त्यांच्या विरोधात एकजूट करण्यात आली आणि त्यांना एकटं पाळडण्यात आलं. त्याचप्रमाणे मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण मी या राज्याचा नगरसेवक ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास केलाय. ते देखील अनेकांना सहन होत नाही. त्यांच्या अद्यापही पोटात दुखत आहे. मात्र त्यासाठी मी मुख्यमंत्री असताना त्यांच्यासाठी संपूर्ण राज्यात हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे. यामध्ये मोफत उपचार केले जातात. त्यामुळे त्यांनी पोट दुखत असेल तर त्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावेत. पण वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्यासाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच लागतात. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पाय तुडवले बाळासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध केलं त्याचीच प्रचिती त्यांना येत आहे.
मोठी बातमी! ठाकरेंना ‘डबल केसरी’चा जय महाराष्ट्र, चंद्रहार पाटलांचा शिंदे गटात प्रवेश
चंद्रहार पाटील हे उद्धव सेनेला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास निश्चित मानलं गेलं होतं. दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट लिहूनही चंद्रहार पाटील यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला होता. ‘माझा कुठल्याही पक्षाबाबत किंवा नेत्याबाबत काहीही आक्षेप नाही. माझा आक्षेप आहे तो महाविकास आघाडीबाबत आहे. लोकसभा निवडणूक लढत असताना माझ्या उमेदवारीबाबत सगळ्यांनी काय झालं ते पाहिलं. पण शेतकऱ्याच्या मुलाला हरवण्यासाठी महाविकास आघाडीही माझ्यासमोर शत्रू म्हणून उभी राहिली. महायुतीही शत्रू म्हणून उभी राहिली. मी ती निवडणूक एकटा लढलो, मागे हटलो नाही असं मत चंद्रहार पाटील यांनी पुन्हा एकदा व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार; वाचा, हवामान विभागाचा अंदाज
लोकसभेत ६० हजार मतं मला मिळाली. ही संख्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जास्त मोठी नाही. कारण, चार लाख वगैरे मतं घेऊन निवडून येत असतो. पण आज शेतकऱ्यांचा मुलगा दिग्गजांसमोर उभा होता. मात्र, सांगली जिल्ह्याला घराणेशाहीची कीड लागली आहे. माझ्यासाठी ६० हजार मतं खूप मोठी आहेत. मला ताकद द्या, ६० हजार मतांची ताकद मी सहा लाख मतांमध्ये करु शकतो असा विश्वास आहे असंही ते यावेळी म्हणाले.