‘चोऱ्या केल्या म्हणूनच पक्षातून हाकललं’; महाजनांनी खडसेंचं सगळचं सांगितलं

‘चोऱ्या केल्या म्हणूनच पक्षातून हाकललं’; महाजनांनी खडसेंचं सगळचं सांगितलं

Girish Mahajan Vs Eknath Khadse : राज्यात सध्या सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्योरापाचे सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात थेटपणे भाष्य केल्याने आता खडसे आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलयं. एकनाथ खडसेंच्या भाष्यावर खडसेंनी चोऱ्या पक्षात चोऱ्या म्हणूनच त्यांना पक्षातून हाकललं असल्याचं म्हणत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सगळचं काढलं आहे.

कूपनची झेरॉक्स दिली, भर उन्हात थांबवलं, पण साखर नाही भेटली; विखेंविरोधात संताप

गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांचा राजीनामा हा दाऊदचा आरोप झाला म्हणून नाही तर पक्षात राहून त्यांनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले, त्यामुळं त्यांना पक्षाने हाकलून दिलं होतं. एकनाथ खडसे ज्या फोटोवरुन आरोप करत आहेत ते दहा वर्षांपूर्वीचे कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरुंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील फोटो असल्याचे महाजनांनी स्पष्ट केलं आहे.

10 वर्षांपूर्वी कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरु यांच्या विवाह सोहळ्यात सर्व आमदार खासदार सर्व प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. त्या लग्नात काही लोक आक्षेपार्ह होते असे आरोप होत आहेत. मात्र त्याबाबत आम्हाला कल्पना नाही. त्या विवाह सोहळ्यात आम्ही सर्व उपस्थित होतो, हे आम्ही मान्य करतो. हे यापूर्वीही याविषयी चर्चा झालेली आहे. त्यामुळं हा नवीन विषय नसल्याचंही महाजन म्हणाले आहेत.

Parliament Security Breach : ‘संसदेतील प्रकार गंभीर, सखोल तपास गरजेचा’; PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

तसेच भोसरी भूखंड प्रकरण गौण खनिज उत्खनन प्रकरणात आलेल्या नोटीसमुळं त्यांनी केविलवाणी अवस्था झाली असून त्यांना का बोलावं कळत नाही. त्यामुळं ते वाटेल बेछूट आरोप करताहेत. मात्र, त्यांच्या आरोपाला आम्ही किंमत देत नसून ते एकेकाळी आमच्यासोबत होते. त्यामुळं ते आमचे सहकारी होते. मात्र, आता त्यांची कीव करावी वाटत नसल्याचंही महाजन म्हणाले आहेत.

खडसे सध्या वैफल्यग्रस्त ;
सध्या एकनाथ खडसे हे आता मानसिक तणावात असून दाऊदच्या संभाषणामुळं आपल्याला पक्षातून काढलं असं ते सांगताहेत. वैफल्यग्रस्त परिस्थिती झाल्याने ते काहीतरी बोलायचं म्हणून अशा प्रकारे आरोप करत आहेत. त्यामुळेच ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत बडबड करत असल्याची टीकाही महाजनांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी थोडा वेळ द्या :
फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं पण ते ठाकरे सरकारने टिकवलं नसून आता पुन्हा मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. त्यामुळे थोडा वेळ अजून आम्हाला लागला तर तो देण्यात यावा. आरक्षणासाठी सरकार गतीने काम करीत असून मनोज जरांगेंकडून मुदतवाढही मिळणार असल्याचा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube