‘EVM च्या जनदेशाचा स्वीकार करतोय पण…’; 4 राज्यांच्या निकालावर राऊतांच भाजपला चॅलेंज

‘EVM च्या जनदेशाचा स्वीकार करतोय पण…’; 4 राज्यांच्या निकालावर राऊतांच भाजपला चॅलेंज

Sanjay Raut on Assembly Election Results 2023: राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात भाजपचा आघाडीवर होते. (Assembly Election Results) तर तेलंगणाची निवडणूक काँग्रेसने जिंकली. या निकालावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला चॅलेंज दिले.

चार राज्यातील निकाल आले, आम्ही लोकशाही मानणारे आहोत. Evm च्या माध्यमातून कालचा निकाल आला तो आम्ही स्वीकारतो. कालच्या निर्णयाने लोकं शॉक आहेत. दुसरी गोष्ट आज मिझोराम निकाल येतील. आम्ही जिंकणाऱ्यांचं अभिनंदन करतो. राहुल गांधी यांना पण तेलंगणासाठी अभिनंदन, कालच्या निर्णयानंतर इंडिया आघाडी मजबूत आहे. सहा डिसेंबरला बैठक दिल्लीत होईल, उद्धव ठाकरे ही सहभागी होतील. या राज्याचा निकालानंतर काही मतभेद काही पक्षामध्ये आहेत. मात्र पुढे जायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. 2014 ला आमच्या सोबत झालं तसं. आता राष्ट्रवादी आणि मिंदे गटाचे काय होईल बघा, असंही राऊतांनी म्हटलंय.

मोदी आहे तर बीजेपी आहे. जवाहरलाल, गांधी, पंडित नेहरू यांच्या सोबत मोदी यांची तुलना नाही होऊ शकत. निकाल अपेक्षित नसले तरी तांडव न करता जनमत स्वीकारावं लागेल. दिग्विजय सिंग यांनी evm बद्दल इंडियाचा मुंबईतील बैठकीत संशय व्यक्त केलं होत. लोकांच्या मनात अशा शंका असेल तर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. Evm च्या जनदेशाचा स्वीकार आम्ही केला. आम्ही परत सांगतो एक निवडणूक बेलट पेपरवर घेऊन दाखवा. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं evm ला दोष देतील पण तुमच्या मनात का येतंय. तुमच्या हिम्मत असेल तर या निकालानंतर मुंबईसह पालिकेच्या निवडणूक घ्या. महाराष्ट्रात हे चालणार नाही. अशी घणाघात टीका राऊतांनी यावेळी केली आहे.

अमोल कोल्हेंच्या गाडीवर 16 हजार 900 रुपयांचा दंड प्रलंबित, वाहतुक पोलिसांकडून जशास तसं उत्तर

‘पनोती’ या टिकेचा काही फटका बसला नाही. या जगात अनेक जण हरलेत कोणी ही माजू नये. या निकाला नंतर कोणाचा माज वाढला हा त्यांचा प्रश्न आहे. भाजप हा गरज सरो वैद्य मरो असा आहे. आम्ही हे भोगलंय, आम्ही लढू आम्ही जिंकू. महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि पवार आणि मविआची मॅजिक चालणार आहे. असा विश्वास राऊतांनी यावेळी दाखवला आहे.

या देशात सगळं मॅनेज होतंय, तर evm पण झाल्या तर नवल काय? ऑपेरेशन लोटस नाही भंकस आहे. जाऊ द्या काँग्रेसची लोकं गेली. आमच्या इथली लोकं गेली, राष्ट्रवादीची गेली. वतनदारापासून दूर रहा, आम्ही आज दिल्लीला जाणार आहोत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube