अजित पवार विष्णूदास तर फडणवीसांमुळे मराठी माणसाला सुख नाही; संजय राऊतांचं टीकास्त्र

अजित पवार विष्णूदास तर फडणवीसांमुळे मराठी माणसाला सुख नाही; संजय राऊतांचं टीकास्त्र

Sanjay Raut criticize Ajit Pawar and Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) टीकास्त्र सोडलं. अजित पवार हे दिल्लीतील विष्णूच्या 13 व्या अवताराचे दास आहेत. तर राज्याच्या राजकारणात जोवर फडणवीस आहेत. तो पर्यंत मराठी माणसाला सुख नाही. असं राऊत म्हणाले.

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातलं पहिला मोठा राडा; आर्या अन् निक्कीमध्ये शाब्दिक चकमक

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राऊत म्हणाले की, अजित पवार हे बारामतीचे नवे विष्णूदास आहेत. कारण दिल्लीत विष्णूचा 13 वा आहे. त्याचे ते अवताराचे दास आहेत. म्हणून ते विष्णूदास त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांसोबत विविध वेशांतर करून अमित शाहंच्या भेटी घेतल्या. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा देखील धोक्यात आणली आहे. हे सगळे अल रशिदचे पोर आहेत.

Siddharth Anand: वाढदिवस विशेष रॉम-कॉम ते ॲक्शन सिद्धार्थ आनंदच्या चित्रपट निर्मितीचा अनोखा प्रवास

त्याचबरोबर राज्याच्या राजकारणाचा दर्जा हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच घसरला. त्यामुळे ते जो पर्यंत राज्याच्या राजकारणात आहेत. तो पर्यंत मराठी माणसाला सुख मिळणार नाही. कारण मोदी शाह यांच्या घाणेरड्या राजकारणाने घाणेरड्या लोकांना पदावर बसवलं. त्यामुळे राज्यात भाषेचा, राजकारणाचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे राज्याच्या इतिहासात यांची नावं काळ्या शाईने लिहिली जातील असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

video: काळीज पिळवटून टाकणारी दृष्य; आम्हाला वाचवा, वायनाड भूस्खलन दुर्घटेतील लोकांची आर्त हाक

दरम्यान यावेळी राऊत यांनी मुंबईत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेसाठी त्याचं कौतुक केलं. शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या की, मुंबईत मुलीवर केलेल्या अत्याचाराला लव्ह जिहाद म्हणता येणार नाही. अत्याचार करणाऱ्या पुरूषाला कोणतीही जात किंवा धर्म नसतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube