दुष्काळावर कोणतीही पाऊले उचलली नाहीत ; शरद पवार राज्य सरकारवर बरसले !

दुष्काळावर कोणतीही पाऊले उचलली नाहीत ; शरद पवार राज्य सरकारवर बरसले !

Sharad Pawar News : राज्यात सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीयं, सरकारने तातडीने पाऊलं न उचलल्यास संघर्षाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरमरीत पत्रच लिहिलंय. यासंदर्भातील माहिती शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिलीयं.

शरद पवार पोस्टमध्ये म्हणाले, दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भुमिका घेत आलो. परंतू भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणे कठीण झालंय. दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, असे मी आवाहन करतो. त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय.

खास फोटो शेअर करत आमिरच्या लेकाला दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रांच्या खास शुभेच्छा!

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हणाले पवार?
“मी मागील महिन्यात २४ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. सदर पत्रकार परिषदेते मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भुमिका घेतली होती. आपण देखील आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्‌यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. परंतू या महत्वपुर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी व मंत्री गैरहजर होते. आपण सदर बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच. मात्र राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

मागील दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी, जायकवाडी सारखी महत्वाची धरणे आटली आहेत. संपुर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवाडयासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी ह्या तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.

मागील वर्षी राज्यात केवळ अकराशे टँकर्स होते. आजमितीस ती संख्या ११ हजारांच्या वर गेली असून टँकर्ससाठी पाणी भरण्याचे स्त्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्यातील पशूधन धोक्यात आले आहे. पाण्याअभावी फळबागांची परिस्थिती बिकट झाली असून राज्यशासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. दुष्काळ निवारणाच्या योजना तळागळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत. हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते.”

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर शरद पवार यांनी वेळोवेळी राज्य सरकारकडे उपाययोजनांची मागणी केली. मात्र, राज्य सरकारकडून कोणतीही पाऊले उचलताना दिसून येत नसल्याने अखेर शरद पवारांनी सध्याच्या परिस्थितीतीचं पत्रात उल्लेख करीत सरकारला इशाराच दिलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज