…तर मुख्यमंत्र्यांपासून टोपेंपर्यंत सगळ्यांना पाडा; असं का म्हणाले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके?

…तर मुख्यमंत्र्यांपासून टोपेंपर्यंत सगळ्यांना पाडा; असं का म्हणाले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके?

Laxman Hake :  याआधी ओबीसी समाजाचे अनेक नेते एकत्र आले आहेत, आताच्या नेत्यांनी तस एकत्रित . यायला हवं. आमचे लोक विधान सभेत गेले तर आवडेल. किमान 50 पोर आमची विधानसभेत गेली पाहिजेत. (Laxman Hake ) आमच्या समजाच प्रतिनिधित्व करायला आत जायला हवं अशी प्रतिक्रिया (OBC)ओबीसी आंदोलक लक्ष्मक हाके यांनी दिली. धनगर समाजाचा एकही खासदार आज संसदेत नाही हे वाईट आहे असं म्हणत समाजाला प्रतिनिधीत्व द्ययालाल हवं असंही हाके यावेळी म्हणाले.

धक्कादायक! शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

लोकसभेच्यावेळी मी शरद पवार साहेबांकड गेलो होतो. त्यांनी तिकीट फायनल पण केलं होतं. परंतु, पुढ काय झालं माहिती नाही असा खळबळजनक खुलासा हाके यांनी यावेळी केल आहे. हे खरय की मला केवळ 5 हजार मत पडली आहेत. दरम्यान, ज्योतिबा फुले यांना भवानी पेठमध्ये त्याकाळी कमीच मत पडली होती. तसंच, बाबासाहेब आंबेडकर यांचाही पराभव झाला होता असं म्हणत हाके यांनी आपली तुलना थेट ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहे आंबेडकरांसोबत करण्याचा प्रयत्नचं केल्याचं इथ दिसून आलं आहे. दरम्यान, ते लगेच म्हणाले, मी तुलना करत नाही पण उदाहरण देत आहे.

मराठा बाधंवांवर बेरोजगाराची वेळ आली. नोकरी नाही. याला ओबीसी आरक्षण जबाबदार नाही. आणि मराठा समाज ओबीसीमध्ये आल्याने त्यांची परीस्थिती लगेच बदलणार नाही असं म्हणत त्यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा विरोध केला आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारं महारष्ट्र पहिले राज्य आहे. तूम्ही ओबीसी झाले तरी गरीबी हटणार हे कोण तुम्हाला सागितलं असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. संविधानला आव्हानं देण्याची भाषा करणं योग्य नाही असंही हाके यावेळी म्हणाले.

विश्व विजेता टीम इंडिया भिडणार झिम्बाब्वेशी, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारंगे पाटील म्हणतात आम्ही खूप काही खाल्ले. पण अर्थसंकल्पात ओबीसीला 1% पैसै देत आहेत. मग आम्हाला काय मिळालं आहे? असा प्रतिसवालही हाके यांनी उपस्थित केला आहे. महारष्ट्रात एकही ओबीसी वसतिगृह नाही. सरकारनं सहकरी साखर कारखाना पैसै दिले. ओबीसींना आर्थसंकल्पात काय दिलं असंही हाके यावेळी म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी 288 उमदेवर पडायचे ठरवले आहे त्यांना शुभेच्छा. जर राज्याच हित यामधून होत असेल तर मुख्यमंत्री पासून टोपे पर्यंत सगळ्यांना पाडा अशी टीकाही हाके यांनी यावेळी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube