मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची आज कारागृहातून सुटका करण्यात आलीय. त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अनिल देशमुख यांच्या जामिनाला दिलेली स्थगिती वाढवण्याची सीबीआयची विनंती आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून देशमुख हे आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशमुख आता कारागृहाबाहेर आले आहेत. अनिल देशमुख […]
नागपूर : चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानपरिषदेत “अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार?” असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये सगळ्यांना सर्वश्रुत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर निर्माण केला. त्याचा लोकार्पण झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा केंद्र सरकारच्या […]
नागपूर : शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी भवनाबाहेर पोलिसांशी असभ्य वर्तन करुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? आमदार नितीन देशमुख यांनी काल रवी भवनाच्या बाहेर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्कीसह त्यांनी पोलिसांशी अर्वाच्च […]
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. अनिल देशमुखांवर सुडाचं राजकारण झाल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. त्याचबरोबर अनिल देशमुख प्रकरणाचं प्रायश्चित करण्यासाठी अजित पवार यांना सरकारी विमान दिले असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पत्रकारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेबद्दल केलेल्या प्रश्नाबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या की, […]
नागपूर : मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, कोणाच्या बापाची नाही, मुंबईवर अधिकार सांगितल्यास खपवून घेतलं जाणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सभागृहात ठणकावून सांगितलयं. दरम्यान, कर्नाटकच्या काही मंत्र्यांनी मुंबईत 20 टक्के कन्नड भाषिक, मुंबईला केंद्रशासित करा, अशी मागणी केली. यावर भाष्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील मंत्र्यांचा चांगला समाचार घेतला आहे. ते म्हणाले, ज्यावेळी […]
नागपूर : कर्नाटकला असा ठराव करण्याचा अधिकार नसून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व राज्यांना मान्य करावा लागणार असल्याचं सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. ते म्हणाले, कर्नाटकची जमीन महाराष्ट्राला देणार नसल्याचा ठराव कर्नाटक सरकारने पास केला आहे, कर्नाटकला असा ठराव करण्याचा काहीही अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालायचा निर्णय सर्व राज्यांना मान्यच करावा लागणार असल्याचं त्यांनी […]