वेळ आल्यावर स्वतःच टुणकन उडी मारुन मुख्यमंत्री बनले; शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप

वेळ आल्यावर स्वतःच टुणकन उडी मारुन मुख्यमंत्री बनले; शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप

Eknath Shinde : आपल्याला पदाचा मुख्यमंत्रिपदाचा मोह कधीच नव्हता आणि नाही. आपण जी भूमिका घेतली ती शिवसेना वाचवण्यासाठी आणि शिवसेनेचं (Shivsena)खच्चीकरण थांबवण्यासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी सांगितले. सत्तेचा लोभ मनामध्ये ठेवून शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP alliance)माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते पुण्यातील खेडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शिवसंकल्प अभियानामध्ये बोलत होते.

एअरटेलच्या इंजिनिअरला जबर मारहाण : IAS अमन मित्तल अन् भावाविरोधात गुन्हा दाखल, अटकेची मागणी

यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 1985 साली मुख्यमंत्री होता आलं असतं पण त्यांनी आपल्या सहकाऱ्याला मुख्यमंत्री बनवलं पण 2019 साली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची संधी आल्यावर स्वतःच पदावर जाऊन बसले, अशी टीका करत मुख्यमंत्रिपद घेऊन काय मिळवलं? काय गमावलं याचा विचार त्यांनी करावा, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : खोट्याच्या कपाळी गोटा; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात…

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी महाविकास आघाडीच्या काळात नगरविकास खात्याचा मंत्री होतो. माझ्यासोबत शिवसेनेचे सात-आठ मंत्री बाहेर पडले. सत्तेवर लाथ मारुन कुणी जात नाही, सत्तेच्या दिशेने जात असतात. पण सत्ता सोडण्याचं काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना टिकवण्यासाठी आम्ही केलं असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

जर बंड करायचं असतं तर 2019 ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर जे काही घडू लागलं त्याचवेळी केलं असतं. पण त्यावेळेस माझ्या मनात तेव्हाही नव्हतं आणि आत्ताही नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. राज्यातील अंगणवाडीसेविकांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय हे सरकार राहणार नाही. एक बैठक त्यावर झाली आहे. एसटीमध्ये महिलांना 50 टक्के सवलत देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1985 साली मनात ठरवलं असतं तर ते मुख्यमंत्री बनू शकले असते. पण त्यांनी ते केलं नाही. सरकार बनवलं, पण एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवलं. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी जेव्हा मुख्यमंत्री बनण्याची वेळ आली तेव्हा स्वतःत टुणकन उडी मारुन खुर्चीवर जाऊन बसले. असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

मुख्यमंत्रिपद घेऊन उद्धव ठाकरे यांनी काय कमावलं? काय गमावलं? याचं आत्मचिंतन ज्यांनी करायचं त्यांनी करावं, पण आपला पक्ष जो आहे, ते मुख्यमत्री झाल्यानंतर शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. शिवसेनादूत म्हणून काम आपल्याला करायचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube