Baramati Agro : कारवाईचे निर्देश देणार ‘ते’ दोन बडे नेते कोण? रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ

Baramati Agro : कारवाईचे निर्देश देणार ‘ते’ दोन बडे नेते कोण? रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ

बारामती : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. (Rohit Pawar alleged that action was taken against Baramati Agro Company at the behest of two big leaders of the state)

दरम्यान, यावेळी रोहित पवार यांनी दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र हे दोन बडे नेते नेमके कोण? असा सवाल विचारला जात आहे.

बारामती ॲग्रोवर मध्यरात्री 2 वाजता कारवाई; वाढदिवसानिमित्तच्या ‘गिफ्ट’साठी रोहित पवारांनी मानले आभार

काय म्हणाले रोहित पवार?

राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.

युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.

Manipur : मणिपुरात पुन्हा जाळपोळ! संतप्त जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग

हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे.

असो! पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील.

रोहित पवार विरुद्ध भाजप-अजित पवार गट संघर्ष :

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या बंडानंतर भाजप आणि अजित पवार यांच्या गटाविरुद्ध महाराष्ट्रभर वातावरण तापवलं आहे. सभा, दौरे या माध्यमातून ते महाराष्ट्रभरात फिरत असून तरुणांमध्ये त्यांची क्रेझ वाढताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ही कारवाई झाली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी करत दोन बड्या नेत्यांवर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube