Ahmedabad Plane Crash : सुरक्षा ही सरकारची जबाबदारी, सुप्रिया सुळेंनी केली मोठा मागणी

Ahmedabad Plane Crash : सुरक्षा ही सरकारची जबाबदारी, सुप्रिया सुळेंनी केली मोठा मागणी

Supriya Sule On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद विमानतळाजवळच एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा अपघात (Air India Plane Crash ) झालाय. विमान पडल्यानं अनेकांचा मृत्यू झालाय. यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) म्हटलंय की, आज ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, आता रिपोर्टची वाट बघावी लागेल. येणाऱ्या अधिवेशनात पहलगाम आणि यावर डिटेल्स चर्चा करावी, (Ahmedabad Plane Crash) अशी मागणी करू. सुरक्षा ही सरकारची जबाबदारी असल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

तर यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, पहलगाम हल्ल्यात ज्या लोकांना गमावलं आहे, त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना नोकरी द्यावी. आसावरी जगदाळेची नोकरी पक्की करावी. त्यांनी ही मागणी मान्य केली. जगदाळे कुटुंबाला आधार दिला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आसावरीची नोकरी पुण्यात असावी. पीएमसीमध्ये असावरीला नोकरी द्यावी, ही मागणी असंही त्यांनी म्हटलंय.

Air India Plane : ‘विमानापेक्षा बसचा एसी थंड ‘, बोईंग 787…अपघाताआधीच आकाशने दिले होते संकेत, पाहा VIDEO

सरकारने मार्ग काढावा…

राज्य सरकारने दिलेला शब्द पाळावा. गंगाधाम चौकात अपघात झाला. रस्त्याची कामे लवकर पूर्ण करा. जे प्रभाग पडतील, ते सगळं पारदर्शक व्हावे. फॉर्म्युला सर्व राज्याला लागू असावा. वाड्याची अवस्था बिकट आहे. अनेक प्रकल्प रखडले आहेत. खडकवासला धरणातील प्रदूषणावर लक्ष घालावं, सरकारला याबाबत सांगितलं आहे. वाहतूक कोंडी देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, यावर मार्ग काढावा.

मोठी बातमी : राजकारणात भाकरी फिरणार; शिंदे अन् अजितदादांना पवारांकडून युतीच्या टाळीचे संकेत

सुरक्षा महत्त्वाची

रस्त्यावरील सुरक्षा महत्त्वाची आहे. पुण्यात नवं टर्मिनल झालं आणि पहिल्या पावसात ते तुंबलं, असं कसं याची चौकशी व्हावी? इन्फ्रास्ट्रक्चर होत आहेत, पण सुरक्षेचे काय? पब्लिक ट्रान्सफर हा विषय योग्य हाताळायला हवा. पब्लिक ट्रान्सफर सुरक्षित असलं पाहिजे. सगळ्या बाबतीत बेसिक सेफ्टी पाहिजे. आजच्या बैठकीत पाण्याची, रस्त्याची या सगळ्यांवर चर्चा झाली. प्री मॉन्सून काय तयारी आहे? याचा आढावा घेतला. पालखीच्या तयारीसासाठी देखील चर्चा झाली, असंही सुळेंनी म्हटलं आहे. तर राज्यभरात पक्षाचे नेतृत्व आहे, त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील असं देखील सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube