IND vs AUS 3rd Test : भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला सामना

IND vs AUS 3rd Test : भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला सामना

IND vs AUS 3rd Test : टीम इंडियाने बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 2023 चा तिसरा सामना गमावला आहे. (IND vs AUS) इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. (IND vs AUS LIVE Score) अवघ्या अडीच दिवसांत ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा पराभव केला. ( Border Gavaskar series) ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फक्त 76 धावा करायच्या होत्या, ज्या त्याने पहिल्या सत्रातच केल्या.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, पण नंतर कांगारू फलंदाजांनी प्रथम अत्यंत सावधपणे फलंदाजी केली आणि नंतर तडफदार पद्धतीने धावा केल्या आणि विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात उस्मान ख्वाजाची (0) विकेट गमावली होती. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला हे लक्ष्य सहजासहजी गाठू देणार नाही, अशी आशा निर्माण झाली होती, मात्र ट्रॅव्हिस हेड (49) आणि मार्नस लबुशेन (28) यांच्यातील 78 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग सुकर झाला.

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांसमोर रोहित आणि शुभमन जोडीने 27 धावांची वेगवान भागीदारी केली, मात्र कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या फिरकीपटूंकडे चेंडू सोपवताच भारतीय फलंदाजांची अवस्था बिकट झाली. 18 धावांच्या आतच टीम इंडियाचे 5 विकेट पडल्या. यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांनी थोडा संघर्ष केला पण ते टीम इंडियाला 109 धावांपर्यंतच नेऊ शकले. सर्व विकेट ऑस्ट्रेलियन फिरकी त्रिकुटाने घेतल्या. मॅथ्यू कुह्नेमनने 5, नॅथन लायनने 3 आणि टॉड मर्फीने 2 विकेट घेतल्या.

IND vs AUS 3rd Test: फिरकीच्या जाळ्यात फलंदाज अडकले, भारत पराभवाच्या उंबरठ्यावर

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 88 धावांची आघाडी
यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या डावात स्थिर सुरुवात केली आणि उस्मान ख्वाजा (60), मार्नस लॅबुशेन (31) आणि स्टीव्ह स्मिथ (26) यांच्या खेळीमुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 4 गडी गमावून 156 धावा केल्या. पण दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला आपल्या स्कोअरमध्ये केवळ 41 धावांची भर घालता आली आणि 197 धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जडेजाने 4 तर उमेश यादव आणि अश्विनने 3-3 बळी घेतले.

भारताचा दुसरा डावही 163 धावांवर
सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. येथे टीम इंडियाचे फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले आणि चेतेश्वर पुजारा (59) शिवाय दुसरा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकला नाही. याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी संपूर्ण भारतीय संघ 163 धावांवर आटोपला. येथे नॅथन लिऑनने 8 विकेट घेतल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अवघ्या 76 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी एक विकेट गमावून सहज पूर्ण केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube