IPL 2025 : नवे वेळापत्रक जाहीर होताच बीसीसीआयचा मोठा निर्णय,’ही’ 5 शहरे बॅन…नेमकं काय घडलं?

IPL 2025 BCCI Not Selected Five Cities Of India : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होताच बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केलंय. आयपीएल 2025 चे (IPL 2025) उर्वरित सामने 17 मे ते 3 जून दरम्यान खेळले जाणार आहेत. परंतु नवीन वेळापत्रक जाहीर करताना, बीसीसीआयने आपल्या एका निर्णयाने आश्चर्यचकित केलंय. हा निर्णय भारतातील 5 शहरांमध्ये आयपीएल 2025 चे सामने न घेण्याशी संबंधित आहे. नवीन वेळापत्रकानुसार भारतातील फक्त 6 शहरांमध्ये सामने खेळले जाणार आहेत.
पाच शहरांमध्ये आयपीएल सामन्यांना ‘बंदी’ का?
भारतातील पाच शहरांमध्ये आयपीएल 2025 च्या सामन्यांवर बंदी का घालण्यात आली? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. याचं उत्तर म्हणजे, ही पाच शहरे सीमेजवळ आहेत. नवीन वेळापत्रकात, बीसीसीआयने सामने आयोजित करण्यासाठी (Ipl 2025 Matches) त्याच 6 शहरांची निवड केली आहे, जी भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून खूप दूर आहेत. ते कोणत्याही शेजारील देशाच्या सीमेला लागून नाही.
आयपीएल 2025 चे सामने फक्त 6 शहरांमध्येच
आयपीएल 2025 चे सामने यापूर्वी बेंगळुरू, (Cricket News) जयपूर, दिल्ली, लखनौ, चेन्नई, धर्मशाळा, कोलकाता, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, मुल्लानपूर, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी येथे खेळवण्यात आले होते. या 13 शहरांपैकी आता फक्त 6 ठिकाणी आयपीएलचे सामने होणार आहेत. ती ठिकाणे म्हणजे बेंगळुरू, जयपूर, दिल्ली, लखनऊ, मुंबई आणि अहमदाबाद.
Daily Horoscope : नोकरीत प्रमोशन, विवाहयोग जुळून आलेत; आज ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार
उर्वरित शहरांमध्ये, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी यांना फारसे महत्त्व नाही, कारण तिथे फारसे सामने झाले नव्हते. धर्मशाळा हे पंजाब किंग्जचे दुसरे तळ आहे, परंतु ते महत्त्वाचे ठरते, कारण येथे सामना सुरू होता, जो भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे तातडीने रद्द करण्यात आला. धर्मशाळा हे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून फार दूर नाही, त्यामुळे बीसीसीआयने येथे पुढील सामने न घेण्याचा निर्णय घेतला.
धर्मशाळा वगळता चेन्नई, मुल्लानपूर, कोलकाता आणि हैदराबादमध्ये पुढील कोणतेही सामने होणार नाहीत. चेन्नई, मुल्लानपूर, कोलकाता ही भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेली शहरे आहेत. चेन्नई आणि हैदराबादमध्ये सामना न आयोजित करण्याचे आणखी एक कारण म्हणजे आयपीएल 2025 मध्ये त्या शहरांच्या संघांची खराब कामगिरी. ते आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.