अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह पराभूत झाले. त्यांना बबनराव पाचपुतेंचे पुतणे साजन पाचपुते यांनी पराभूत केले. या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली. कुटुंबातील सदस्याविरोधात निवडणूक का लढविली ? याबाबत साजन पाचपुते यांनी लेट्सअपशी संवाद साधला. मी आणि प्रतापसिंह हे एका आईची लेकरे नसल्याचे सांगत आगामी काळातही सत्तासंघर्ष सुरूच […]
नागपूरः ८३ कोटींचा भूखंडावरून मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी मंगळवारी घेरले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी मुख्यमंत्र्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेत. आज विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरत सरकार, मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार, अश्या घोषणाही देण्यात आल्यात. 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना देणे म्हणजे मंत्रिपदाचा दुरुपयोग तत्कालीन नगरविकास मंत्री तसेच विद्यमान मुख्यमंत्र्यांनी केला […]
सोलापूरः निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर अनेक जण नवस करतात. काही जण वेगळे निर्धार करतात. आपला नेता विजयी होईपर्यंत चप्पल घालणार, दाढी करणार नाही, असे अनेक जण आहेत. तसाच निर्धार पंढरपूरमधील एकाने केलाय. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्याची पत्नी विजयी झाली आहे. त्यामुळे तो आता तीन वर्षानंतर दाढी, डोक्याचे केस काढणार आहे. पंढरपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला […]
अहमदनगरः कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार या थेट ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणूक लढल्या. निवडून येत संगमनेर तालुक्याच्या निळवंडे गावच्या सरपंच झाल्या आहेत. शशिकला पवार यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत सुशिला उत्तम पवार यांचा २२७ मतांनी पराभव केला. संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात थोरात गटाने २७, विखे गटाने ९ […]
अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत थोरात-विखे गटातील राजकीय संघर्ष पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे जन्म गाव असलेल्या जोर्वे गावासह तीन ग्रामपंचायतीतील सत्ता थोरात गटाला गमवावी लागली आहे. तर थोरात गटानेही निमगाव जाळी व उंबरी बाळापूर ग्रामपंचायतीत विखे गटाला प्रतिधक्के दिले आहेत. संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात थोरात […]
नागपूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 83 कोटी रुपयांचा भूखंड 2 कोटी रुपयांना दिल्याचा मुद्दा आता विरोधकांनी अधिवेशनातच उपस्थित केलाय. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेरल्यानंतर त्यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. पण विरोधकांनी सभापती यांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळामुळे सभागृह काही वेळासाठी तहकूब करण्याची वेळ आली. भूखंडाचा मुद्दा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास […]
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्यांचे पूत्र प्रतापसिंह यांचा पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव केलाय. त्यामुळे पाचपुते यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बबनराव पाचपुते यांच्या राजकीय वाटचालीतील चाणक्य म्हणून त्यांचे भाऊ सदाशिव पाचपुते ओळखले जात होते. दोन वर्षांपूर्वी सदाशिव पाचपुते […]
पुणेः आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गटाने बाजी मारली आहे. या तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतीवर वळसे पाटील गटाची सत्ता आली आहे. एक ग्रामपंचायत शिंदे गटाकडे, तर एक ग्रामपंचायत ठाकरे गटाला मिळाली आहे. आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील नागापूर, डिंभे खुर्द, आहुपे, तळेघर, चिखली या ग्रामपंचायती बिनविरोध […]
अहमदनगरः पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्येही धक्कादायक निकाल लागले आहेत. वनकुटे गावामध्ये आमदार निलेश लंके यांच्या गटाचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झालाय. लंकेंसाठी हा मोठा धक्का आहे. या ग्रामपंचायतीमध्ये अॅड. राहुल बबन झावरे हे प्रथम लोकानियुक्त सरपंच निवडून आले होते. यंदा ही जागा महिलांसाठी राखीव होती. यावेळी झावरे यांची पत्नी स्नेहल या सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. त्यांचा स्थानिक विकास […]
कोल्हापूरः कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या समरजित घाटगे गटाने बाजी मारली आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ गटाकडून घाटगे गटाने ग्रामपंचायती हिसकावून घेतल्या आहेत. कायम सत्ता असलेल्या मुश्रीफांना हा मोठा धक्का मानला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतींच्या मतमोजणी सुरू आहे. त्यात कागल तालुक्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटाला […]