Abhiman Movie: हिंदी चित्रपटसृष्टीतील सोनेरी पान; ‘अभिमान’ ला 51 वर्षे पूर्ण

Abhiman Movie: हिंदी चित्रपटसृष्टीतील सोनेरी पान; ‘अभिमान’ ला 51 वर्षे पूर्ण

51 Years Of Abhimaan: 27 जुलै 1973 रोजी प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) स्टारर चित्रपट ‘अभिमान’ला (Abhiman Movie) 51 वर्षे पूर्ण होत आहेत. हृषीकेश मुखर्जी यांनी अमिताभ-जया यांना मुख्य भूमिकेची ऑफर दिली, त्यावेळी दोन्ही कलाकारांमध्ये रोमान्स सुरू होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक महिना आधी दोघांनी लग्न केले. या चित्रपटात सशक्त भूमिका केल्याबद्दल जया यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर (Filmfare Award) पुरस्कार मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


मानवी नातेसंबंधातील चढ-उतारांवर आधारित ‘अभिमान’ या संगीतमय चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिका होती. सुमधुर गाणी आणि संगीताने सजलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपट समीक्षक आणि लेखक सैबल चॅटर्जी यांनी बीबीसीला सांगितले, ‘अमिताभ यांचा त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपट होता अभिमान. त्या काळी प्रेक्षकांची गर्दी थिएटरमध्ये व्हायची. पालक आपल्या मुलांसह आणि संपूर्ण कुटुंबासह थिएटरमध्ये पोहोचत होते, विशेषत: दुपारी आणि संध्याकाळच्या कार्यक्रमांमध्ये खूप गर्दी असायची. ‘लुटे कोई मन का नगर’, ‘अब तो है तुमसे, हर खुशी अपनी’, ‘मीत ना मिला के मन का’ यांसारखी गाणी आजही मनाला समाधान देतात.

Amitabh Bachchan यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची जलसाबाहेर गर्दी, Video Viral

पत्नीच्या यशाचा पतीला हेवा वाटू लागला

‘अभिमान’च्या कथेत प्रसिद्ध गायक सुबीर त्याची पत्नी उमा हिला गाण्यासाठी प्रोत्साहित करतो, पण सुखी वैवाहिक जीवनात वाद निर्माण होतो जेव्हा पत्नी उमा तिच्या पतीपेक्षा गाण्यात यशस्वी होते. लग्नानंतर पतीच पत्नीला त्याच्यासोबत स्टेजवर गाण्यासाठी तयार करतो आणि लवकरच पत्नी स्टार गायिका बनते. अशा स्थितीत पतीचा अहंकार दुखावतो आणि मत्सराची भावना निर्माण होते. कथा साधी आहे, पण हृषिकेश दा यांनी ज्या पद्धतीने ती पडद्यावर मांडली, ती प्रत्येक सामान्य माणसाच्या हृदयाला भिडली.

Amitabh Bachchan: बिग बीं यांचा’कल्की 2898 एडी’तील दमदार लूक समोर; नवीन पोस्टर रिलीज

‘अभिमान’ पाहून करण जोहरला अश्रू अनावर

या चित्रपटाच्या कथेने पुरुषांना स्पष्टपणे संदेश दिला की मत्सर आणि अहंकाराची किंमत मोजावी लागते, तर महिलांसाठीही संदेश होता की त्यांनी एका मर्यादेपलीकडे पतीचे वाईट वागणे सहन करू नये. हा कालातीत चित्रपट केवळ प्रेक्षकांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही आवडला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने ‘अभिमान’ला त्याचा आवडता चित्रपट म्हणून वर्णन केले आहे आणि हे देखील कबूल केले आहे की जेव्हाही तो चित्रपट पाहतो तेव्हा अश्रू येतात. विद्या बालननेही कबूल केले की तिने त्या काळातील चित्रपट अनेकदा पाहिला आहे.

जया-अमिताभ यांचा संस्मरणीय चित्रपट
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोलकाता येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात ‘अभिमान’ने झाली होती. या चित्रपटाची आठवण करून देताना अमिताभ बच्चन म्हणाले होते की, या चित्रपटात मी आणि जया यांनी आमच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याची गाणी आजही स्मरणात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube