Aamir Khan: आमिर खान मुंबईला रामराम ठोकणार? नेमकं प्रकरण काय?

Aamir Khan: आमिर खान मुंबईला रामराम ठोकणार? नेमकं प्रकरण काय?

Aamir Khan: ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chadha) या सिनेमातून आमिर खानने जबरदस्त कमबॅक करायचा प्रयत्न केला, पण या सिनेमाला बॉयकॉट ट्रेंडचा चांगलाच फटका बसला. प्रेक्षकांनी या सिनेमाकडे सपशेल पाठ फिरवली अन् तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिरच्या (Aamir Khan) कारकीर्दीतील हा आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. सध्या आमिर खान मुंबई (Mumbai City) सोडून जाणार असल्याचे सांगितलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)


आमिर खान मुंबई सोडून चेन्नईला (Chennai) शिफ्ट होणार असल्याचे सांगितलं जात आहे. आमिर खान मुंबई सोडून जाणार हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. अभिनेता त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे मुंबईला रामराम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आमिरसाठी त्याचे कुटुंब खूप महत्त्वाचे आहे आणि कुटुंबासाठी त्याला हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आमिर खानची आई जीनत हुसैन चैन्नईचाय एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. आमिर खानला आईसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. यासाठी तो चेन्नईला शिफ्ट होणार आहे. आमिर खानच्या जवळच्या एका व्यक्तीने याबद्दल माहिती दिली आहे. आमिर खान त्याची आई ज्या हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्या जवळचा एका हॉटेलमध्ये राहणार आहे. आमिर खान फक्त 2 महिन्यासाठी चेन्नईला शिफ्ट होणार आहे.

Mera Piya Ghar Aaya: सनीच्या गाण्याने 24 तासांत युट्युबवर घातला धुमाकूळ, तोडले सर्व रेकॉर्ड

आमिर खान लवकरच त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या सिनेमाची घोषणा केली. या सिनेमात आमिरसोबत जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत चाहत्यांना बघायला मिळणार आहे. नुकतंच आमिरने पंजाबी सिनेमा‘कॅरी ऑन जट्टा ३’च्या ट्रेलर लॉंच सोहळ्याला हजेरी लावली. या सिनेमाचा ट्रेलर आमिरच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. आमिर खान आता सनी देओल अभिनीत आणि राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘लाहोर १९४७’ची देखील निर्मिती करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube