तेव्हा मला पाकिस्तानमधून एका दिवसात किमान पन्नास… अभिनेत्री ममता कुलकर्णीचं मोठ वक्तव्य

Actress Mamta Kulkarni : प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. (Actress) सध्या ती तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने पाकिस्तान आणि मुस्लिमांबाबत एक मोठं वक्तव्य केलं. अभिनेत्री म्हणाली, पाकिस्तानमधून तिच्यासाठी दररोज 50 पत्रं यायची असं ती म्हणाली आहे.
ममताने माध्यमांशी संवाद साधताना काही गोष्टींवर भाष्य केलं आहे. मुस्लिमांसाठी माझ्या मनात खूप प्रेम आहे. त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे. विशेषतः दुबईमध्ये, जिथे माझी आध्यात्मिक साधना 25 वर्षे चालली होती. या काळात मला तिथे खूप शांती आणि प्रेम मिळालं असं ममता म्हणाली.
मी चर्चा करुन निघायच्यावेळी त्याने मला जबरदस्ती अभिनेत्री सुरवीन चावलाने सांगितली ती घटना
त्याचबरोबर जेव्हा मी बॉलिवूडची सुपरस्टार होते, तेव्हा मला पाकिस्तानमधून एका दिवसात पन्नास पत्रं मिळायची. त्यामुळे होय, माझ्या मनात मुस्लिमांसाठी खूप प्रेम आहे. पण माझ्या मनात दहशतवाद्यांसाठी कोणतंही प्रेम नाही. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ममताचं हे वक्तव्य आता खूप चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव आहे. हा तणाव तेव्हा सुरू झाला जेव्हा जम्मूच्या पहलगाममध्ये काही दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरने प्रत्यूतर दिलं. या कारवाईत त्यांनी पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या ऑपरेशननंतर पाकिस्ताननेही भारतावर अनेक अयशस्वी हल्ले केले होते.