Deewana तून पदार्पण करताना ‘त्या’ गाण्यासाठी ऋषी कपूरशी वाद अन् असं चमकलं शाहरूखचं करिअर

Deewana तून पदार्पण करताना ‘त्या’ गाण्यासाठी ऋषी कपूरशी वाद अन् असं चमकलं शाहरूखचं करिअर

Deewana films song Shah rukh Khan Rishi Kapoor dispute : अभिनेता शाहरुख खान (Shah rukh Khan) म्हटलं की त्याचे एक ना अनेक चित्रपट गाणे लगेच डोळ्यासमोर येतात. त्यात शाहरूखचा पहिला चित्रपट चित्रपट दिवाना अत्यंत खास राहिला. 32 वर्षांपूर्वी म्हणजे 25 जून 1992 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या आला होता. याच दिवाना (Deewana film) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना शाहरुखला थेट एका गाण्यासाठी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) त्यांच्याशी वाद घालावा लागला होता. कोणता आहे हे गाणं आणि हा वाद नेमका काय होता? जाणून घेऊ….

अफगाणिस्तानने बांग्लादेशला लोळवलं, सेमी फायनलमध्ये धडक; ऑस्ट्रेलियाचं पॅकअप

दिवाना या चित्रपटातील प्रचंड गाजलेलं गाणं म्हणजे ‘ऐसी दिवानगी देखी नही कभी’ मात्र याच गाण्यावरून चित्रपटातील मुख्य अभिनेते ऋषी कपूर आणि शाहरुख खान यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. हे गाणं त्या वेळचे प्रसिद्ध गायक विनोद राठोड यांनी गायलं होतं. त्यांचे गाणे त्या काळात अत्यंत प्रसिद्ध व्हायचे.

विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधीच असणार; इंडिया आघाडीच्या बैठकीत झाली होती चर्चा, सूत्रांची माहिती

त्यामुळे शाहरुख खानला हे गाणं आपल्या करिअरचं पहिलं गाणं असल्याने आपल्यावर चित्रित व्हावं असं वाटत होतं. तर ऋषी कपूर यांना आपण इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेता असल्याने आपल्यावरती चित्रित व्हावं असं वाटत होतं. तसेच विनोद राठोड हे नेहमीच ऋषी कपूर साठी गाणं गात होते. यावरून अभिनेत्यात चांगलाच वाद झाला होता.

हा वाद इतका टोकाला गेला की, कित्येक दिवस हे दोन अभिनेते एकमेकांशी बोलतही नव्हते. त्यावेळी निर्माते शबनम यांनी या दोघांमध्ये मध्यस्थी करत हा वाद मिटवला आणि अखेर हे गाणं शाहरुख खानवर चित्रित करण्यात आला. चित्रपटाचे कथानक आणि हे गाणं त्यावेळी चित्रपटगृहांपासून घराघरांमध्ये शाहरुख खान आणि दिव्या भारती यांची खास केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड भावली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube