एकमेकांच्या तोंडाकडेही न बघणाऱ्या सलमान-शाहरुखमध्ये बाबा सिद्दीकींनी ‘मैत्री’ घडवली होती…

एकमेकांच्या तोंडाकडेही न बघणाऱ्या सलमान-शाहरुखमध्ये बाबा सिद्दीकींनी ‘मैत्री’ घडवली होती…

Who is Baba Siddiqui: मैत्री आणि शत्रुत्वाचे उदाहरण बॉलिवूडमध्ये (Bollywood) कायम पाहायला मिळत असते. सर्वोत्तम मित्र कधी एकमेकांचे शत्रू बनतात आणि दोन ज्ञात शत्रू कधी प्रिय मित्र बनतात हे सांगणे खूपच कठीण आहे. शत्रू झालेल्या दोन लोकांमध्ये पुन्हा मैत्रीचे बीज पेरणे हे देखील त्याहून कठीण काम असते. द्वेषात पुन्हा प्रेमासाठी जागा निर्माण करणे. असे विशेष काम करणारी व्यक्तीही खूप खास असते. असेच एक उदाहरण म्हणजे बाबा सिद्दीकी.

बॉलीवूडचे चाहते आजही बाबा सिद्दकी यांनी केलेली किमया विसरू शकत नाहीत. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचे आवडते भाईजान. बाबा सिद्दिकी यांच्यामुळेच ज्याचा चाहत्यांनी कधी काळी स्वप्नातही विचार केला होता, ती गोष्ट म्हणजे शाहरुख खान आणि सलमान खान यांना दोन चांगले मित्र एकत्र केले आणि नंतर त्या सर्वोत्तम मित्रांनी चित्रपटसृष्टीत एक अनोखा इतिहास रचला.

शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील मैत्री आणि शत्रुत्वाबद्दल सांगायचे तर एकेकाळी एकमेकांना आपला भाऊ मानणारा शाहरुख सलमान एकमेकांचा कट्टर शत्रू बनला होता. पण त्याची सुरुवात नेमकी कशी झाली आणि का सुरू झाली हे कोणालाच माहीत नाही. दोघांनाही एकमेकांसोबत चित्रपट करायला आवडत नव्हते आणि एकमेकांचा चेहरा पाहणे देखील पसंत करत नव्हते.

याशिवाय दोघांचे शीतयुद्ध वेगळ्याच उंचीवर गेले होते. परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली होती की, सलमान खान एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित असेल तर शाहरुख खान तिथे जायला टाळत असत. या दोघांना एकत्र कधीच कोणी पाहू शकत नव्हते. सुमारे 5 वर्षे चाललेले हे वैर अखेर एके दिवशी संपले. सलमान-शाहरुखच्या वैराचे पुन्हा एकदा मैत्रीत रूपांतर झाले. बॉलीवूडसाठी हा एक चमत्कार होता आणि ज्याने हा चमत्कार घडवला तो  बाबा सिद्दीक यांनी.

मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा : देवरांपाठोपाठ बाबा सिद्दीकीही सोडणार ‘हात’

बाबा सिद्दीकी यांच्यामुळे सलमान आणि शाहरुखचे परस्पर असलेले वैर अखेर संपले आणि पुन्हा मैत्री झाली. सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी आजही बॉलिवूडच्या इतिहासाच्या पानांमध्ये नोंदली गेली आहे, जिथे सलमान-शाहरुख शत्रूपासून मित्र बनले. तो दिवस उजाडला 2013 साली. 2008 मध्ये झालेल्या सलमान आणि शाहरुखमधील मतभेद संपल्यानंतर, त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि 2013 मध्ये सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीमध्ये एकमेकांना भेटले.

तेव्हापासून दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. त्यांच्या मैत्रीनंतर दोघेही फॅन आणि पठाण या चित्रपटात एकत्र दिसले होते. दोघेही अनेक रिॲलिटी शोचा भाग बनले. बाबा सिद्दीकी हे इफ्तार पार्टी आयोजित करण्यासाठी आणि चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील सर्वात मोठ्या स्टार्सना एकाच छताखाली आणण्यासाठी ओळखले जातात. वर्षातून एकदा सलमान खान आणि शाहरुख खानसह इतर सेलिब्रिटी त्यांच्या पार्टीत सहभागी होत असतात.

कोण आहेत बाबा सिद्दीकी…:

झियाउद्दीन बाबा सिद्दीकी असं त्यांचं संपूर्ण नाव असून ते काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी राज्य मंत्रिमंडळातील अन्न व नागरी पुरवठा, राज्याचे कामगार मंत्री म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. 1992 आणि 1997 च्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्ती देखील करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज