अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली पवार कुटुंबाची भेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर केलं थेट भाष्य
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. काहीतरी सुचायलाही खूप वेळ जातोय, काय बोलावं हेच सुचत नाहीये.
अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्यातील राजकारणात (Ajit Pawar) अनेक घडामोडी घडत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनीही जोर धरलेला आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनीही या विषयावर भाष्य केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे बोलणं आमच्यासमोर झालं होतं, दोन्ही NCP नं एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं, असं सयाजी शिंदे म्हणाले आहेत. दादांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं, अशी इच्छा आहे असंही सयाजी शिंदे म्हणाले आहेत.
सर्वधर्मसमभाव ठेवून, गरीब-श्रीमंत न बघता, खालून आल्यामुळे त्यांनी सर्व इतकं पुढे नेण्याचं ठरवलं होतं. मला असं वाटतं की, त्यांची स्वप्नं ही आपण सर्वांनी आणि खासकरून सुनेत्रा वहिनींनी, सुप्रियाताईंनी पूर्ण करावीत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं, हे दादांचं पहिलं स्वप्न होतं. हे त्यांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं, तरच महाराष्ट्राला खरी ताकद मिळेल. महाराष्ट्राची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही पवार कुटुंबीय ताबडतोब एकत्र यायला पाहिजे, असं मत सयाजी शिंदे यांनी मांडलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार?, सुनिल तटकरे यांनी सांगितली महत्वाची माहिती
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्यासमोर चर्चा झाली होती, असा दावा त्यांनी यावेळी केला. याविषयी ते पुढे म्हणाले, कौटुंबिक भावना बाजूला सारून त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्यासमोर चर्चा झाली होती. पण अचानक हे सर्व घडलं. कोणीकाही या गोष्टीला वेगळा मार्ग न लावता, त्याआधी दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले, तर महाराष्ट्र पुढे जाईल. सयाजी शिंदेंनी नुकतीच सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. काहीतरी सुचायलाही खूप वेळ जातोय, काय बोलावं हेच सुचत नाहीये. आज मी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. काय बोलावं हेच कळत नव्हतं. त्यानंतर मोठ्या साहेबांचीही भेट घेतली. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. निवडणुकीच्या वेळी, प्रचाराच्या वेळी अशी चर्चा झाली होती की आता एकत्रच येणार आहोत. फक्त औपचारिकता राहिली होती. असं असताना असं अचानक काहीतरी व्हावं, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत वाईट झालं आहे असंही ते म्हणाले.
