अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांनी आम्ही महिला धोरण राबवतोय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
देशाला दिशा देणारी नारी आहे. तेच विचार घेऊन आपल्याला महिला धोरण राबवायचं आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
महिला धोरण हे आमचं ध्येय आहे. (Ahilyadevi Holkar) महिला सक्षमिकरण हे आमचं ध्येय आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दाखवून दिलं की महिला ही फक्त घरातील शक्ती नसून देशात आपलं स्थान निर्माण करणारी एक शक्ती आहे. देशाला दिशा देणारी नारी आहे. तेच विचार घेऊन आपल्याला महिला धोरण राबवायचं आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते चौंडी येथे आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना काय?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची घोषणा केलेली आहे. त्यानुसार, 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बँकेने दिलेले दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज राज्य सरकार माफ करणार आहे.