अहिल्यानगरमध्ये 2 ठिकाणी गोळीबार! नागरिकांत दहशतीचं वातावरण, गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं

अहिल्यानगरमध्ये 2 ठिकाणी गोळीबार!  नागरिकांत दहशतीचं वातावरण, गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं

Firing In Tapovan Road And Jamkhed : अहिल्यानगर शहर गुन्हेगारीच्या विळख्यात जात (Ahilyanagar Crime) असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काल 1 जून रोजी रात्री मध्यरात्री अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. तपोवर रोडवरील ढवन वस्तीमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरालाच हादरवून टाकलंय. मिळालेल्या माहितीनुसार दोन गटांमध्ये किरकोळ कारणातून तणाव (Firing In Tapovan Road And Jamkhed) निर्माण झाला होता. त्यानंतर त्याचं वादात रूपांतर निर्माण झालं. हा वाद दोन स्थानिक गटांमध्ये होतो. सुरूवातीला शा‍ब्दिक असणाऱ्या वादाचं नंतर एका धक्कादायक घटनेत रूपांतर झालं.

या दोन्ही गटांनी शस्त्र हातात घेतल्याचं समोर आलं. तणाव शिगेला पोहोचल्यानंतर काही अज्ञातांनी गोळ्या झाडल्याचं समोर आलं. मध्यरात्री हा गोळीबार झाल्याचं समजतंय. या गोळीबारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला (Crime News) होता. भयभीत नागरिक घराबाहेर धावत आले. घटनेची माहिती मिळतात तोफखाना पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नेमका गोळीबार कोणी केला? कोणत्या गटाचा यात सहभाग होता? याचा पोलीस शोध घेत आहेत. तर घटनेतील संशयित आरोपी फरार आहेत.

तनपुरे कारखाना निवडणुकीत विखे – कर्डिलेंची तटस्थ भूमिका…शेटेंचा पराभव

गोळीबाराची दुसरी घटना जामखेडमध्ये घडली आहे. शुल्लक कारणावरून हा गोळीबार झाल्याचं समजतंय. जामखेडमधील एका व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय.
या घटनेत मुलगा जखमी झाला असून त्याला नगरमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलंय. यामुळे जामखेडमधील नागरिकांमध्ये सुद्धा दहशतीचं वातावरण आहे.

या संपूर्ण घटनेला जामखेडमधील नियमबाह्य सांस्कृतिक कला केंद्र जबाबदार असल्याच्या चर्चा सुरू आहे. अनेक वेळा या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक येतात. या कला केंद्रांवर त्यांना आसरा दिला जातो. तिथे थोडाही कायद्याचा वचक शिल्लक राहिला नसल्याचं बोललं जातंय. तर गावठी कट्टे देखील सर्रासपणे वापरले जात असल्याची तक्रार स्थानिक करत आहेत.

117 ड्रोन, 40 रशियन विमाने अन् दीड वर्षांचे नियोजन; झेलेन्स्कींने सांगितली इनसाईड स्टोरी

कायद्याला खुले आव्हान देणारे प्रकार अहिल्यानगरमध्ये घडत आहेत. त्यामुळे येथील कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलीस यंत्रणा काय करते? जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे. त्याचप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी घडत असताना लोकप्रतिनिधी काय करतात? सिस्टीम वरच संशय घेतला जात आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube