भाषणात बोलता बोलता कधी कधी घसरतो; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संग्राम जगतापांचे टोचले कान

Ajit PawarOn Sangram Jagtap : नगरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Jagtap) हे काही दिवसांपासून हिंदुत्ववादी मुद्यांवर आपली थेट भूमिक मांडत असल्याचं दिसत होत. दरम्यान, त्यांच्या भूमिकेवर जोरदार टीकाही झाली होती. दरम्यान, आता पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांचे कान टोचले आहेत. संग्राम जगताप भाषणात बोलता बोलता कधी कधी घसरतो असं अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार बोलताना म्हणाले, संग्राम जगताप भाषणात बोलता बोलता कधी कधी घसरतो पण आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा अजित पवारांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना पुढे अजित पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षितांना हक्क मिळून देण्याचा अधिकार दिला आहे. सामाजिक न्याय विभागासाठी महायुती सरकारने 25 हजार कोटींची तरतूद केली असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
मोठी बातमी! आ. संग्राम जगतापांना धमकी देणारा गजाआड, थेट तेलंगणात आवळल्या मुसक्या
हे महायुती सरकार कोणतीही कमतरता पडू देणार नाही. जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणताही माय का लाल संविधान बदलू शकणार नाही असे अजित पवार म्हणाले. कोणी सोम्य गोम्या काहीही फेक नरेटिव्ह पसरवीत असेल तर त्याकडं लक्ष देऊ नका असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला. डॉ. आंबेडकरांचा हा पुतळा त्यांच्या समता- बंधुता या तत्वाच स्मरण करून देईल. डॉ. आंबेडकरांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्यात यश मिळवण्याची त्यांची ख्याती होती असंही अजित पवार म्हणाले.
डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी जगात वेगळा ठसा उलटवल्याचे मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. आज संपूर्ण देशामध्ये संविधान प्रमाण मानलं जातं. आज हे स्मारक प्रेरणादायी ठरणार आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर बाबासाहेब हे अहिल्यानगरमध्ये काही दिवस होते. त्यावेळी त्यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तकं लिहिलं होतं असे विखे पाटील म्हणाले. बाबासाहेबांच या जिल्ह्याशी अतूट नातं होतं असं विखे पाटील म्हणाले आहेत.