बदलापूर प्रकरण : अक्षय शिंदे गतीमंद? तीन लग्न झालीत का?; आई-वडिलांच्या दाव्याने नवा ट्विस्ट

  • Written By: Published:
बदलापूर प्रकरण : अक्षय शिंदे गतीमंद? तीन लग्न झालीत का?; आई-वडिलांच्या दाव्याने नवा ट्विस्ट

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी काही धक्कादायक दावे केले आहेत. त्यामुळे आता बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Minor Girls Rape Case) प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून, आपल्या मुलाला या सर्व प्रकरणात मुदाम अडकवण्यात आल्याचंही अक्षयच्या वडिलांनी म्हटले आहे. एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना अक्षयच्या कुटुंबियांनी वरील दावे केले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणाला कसे वळण मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Badlapur Minor Girls Rape Case Akshay Shinde Family Members Shocking Claims)

मुख्याध्यापकांपासून शाळेतील सर्वांचे पोलीस व्हेरिफिकेशन होणार; बदलापूर घटनेनंतर GR निघाला

अक्षयच्या पालकांचे दावे काय?

अक्षय शिंदे याने मुलींसोबत जे काही केले, तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तर, अक्षय हा शाळेत फक्त बाथरुम धुवायचे काम करायचा. बाकी त्याच्याकडे कोणतेही काम नव्हतं, असे अक्षयच्या आईने म्हटले आहे. अक्षयची तीन लग्न झालीत, ही गोष्ट खोटी असल्याचाही दावा अक्षयच्या वडिलांनी केला आहे.

अक्षय शिंदे गतीमंद आईने सांगितले सत्य

पुढे अक्षयच्या आईला तो गतीमंद होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असे सांगितले. मात्र, त्याला छातीत दुखण्याचा त्रास होता तसेच तो डोक्याने कमजोर असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी त्याला काही औषधेदेखील सुरू होत्या असे अक्षयच्या आईने सांगितले. आमचं कुटुंब हाऊसकिपिंगचं काम करायचं. आदर्श शाळेत आम्ही झाडलोट करण्याचे कामही करायचो. आम्ही संध्याकाळी शाळा सुटल्यावर साडेपाचला आत जायचो आणि साडेआठ वाजता बाहेर यायचो, अशी माहिती अक्षयच्या आईने दिली.

Badlapur : बदलापुरचा नराधम पुरता अडकला! वकील संघटनेकडून मोठा निर्णय…

चौकशीसाठी SIT स्थापन

बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेनं (Badlapur Crime) राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून कठोर कारवाईला (Maharashtra) सुरुवात केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे.

बदलापूर घटनेत पोलिसच खरी समस्या; बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांचं मोठं वक्तव्य

24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

बदलापूरच्या घटनेच्या विरोधात मविआकडून येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या आंदोलनात  महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष, घटक पक्ष, अनेक संघटना, शाळा कॉलेज, दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. हे प्रकरण दाबण्यासाठी सरकारनेच प्रयत्न केले असल्याचा आरोपही पटोलेंनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube