भास्कर जाधवांनी मुख्यमंत्र्यांसह नारायण राणेंना धरलं धारेवर

भास्कर जाधवांनी मुख्यमंत्र्यांसह नारायण राणेंना धरलं धारेवर

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसरा कोणी हुकमी एक्का नसल्याने ते ठाकरे यांच्यावर बोलत असल्याचा खोचक टोला ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राणे यांना लगावला आहे.

Ajit Pawar यांनी बैठक घेतली आणि विखेंनी दाखवला इंगा!

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपले प्रश्न मांडण्यासाठी आमदार जाधव विधीमंडळात आले होते. यावेळी त्यांनी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आमदार जाधव म्हणाले, आपलं अस्तित्व आहे हे लोकांच्या लक्षात रहावं यासाठी त्यांना बोलण्यासाठी ठाकरेंशिवाय दुसरा हुकमी एक्का नाही.

‘हे’ चित्र फक्त एका दिवसापुरतं असायला नको; अजित पवारांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान

त्यामुळेच ते तुमच्यसमोर वेडवाकडं बोलत असतील पण मागे ते उद्धव ठाकरेंना धन्यवादच देत असतील, की मी तुमचं नाव घेतो म्हणून टिकून आहे, या शब्दांत जाधव यांनी राणे यांना प्रतिटोला लगावलाय.

उद्धव ठाकरेंविषयी बोलल्याशिवाय विरोधकांची कोणी दखल घेत नाही. ज्या धनुष्यबाणामुळे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आहे, तेच धनुष्यबाण आज गोठवलं गेलं आहे. ज्याला कृतज्ञ असेल त्याला याच्या यातना होतील, असंही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा..! अर्भक आणि माता मृत्यूदराने काळजीत वाढ

उद्धव ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण गेलं, बाळासाहेबांच्या देव्हाऱ्यातून धनुष्यबाण गेलं याचा आनंद जो कृतघ्ज्ञ असेल त्याला होऊ शकतो. या आनंद नारायण राणे यांच्यासह इतरांना होणं हे त्यांच्या स्वभाव प्रकृतीनूसार योग्यच असल्याचंही ते म्हणाले आहेत.

ठाकरेंच्या सभेनंतर राणे लगेचच पत्रकार परिषद घेतात. राणेंना कोणीच सभेला बोलावत नाहीत. आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ते ठाकरेंविषयी बोलत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube