ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही, फडणवींसाचा टोला; सपकाळांचीही उडवली खिल्ली

Devendra Fadnavis On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदी सक्ती विरोधात 5 जुलैरोजी मनसे (MNS) आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून मोर्चा आयोजित करण्यात आला होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा करत हिंदी सक्तीबाबतचा जीआर रद्द करण्याची घोषणा केली आहे. तर आता माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल करत मी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला आहे दोन भावांनी एकत्र येऊ नये असा जीआर काढला नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे बंधूंना लावला. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेते रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दोन भावांनी एकत्र येऊ नये असा जीआर काढलेला नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्हाला कोणतीही अडचण नाही. आम्ही कोणत्याही पक्षाचा हित बघणार नाही आम्ही फक्त महाराष्ट्राच्या विद्यार्थांचा हित बघणार आणि तोच निर्णय घेणार. कोणाच्याही दबावाखाली येणार नाही. अशी भूमिका माध्यमांशी बोलतना फडणवीस यांनी स्पष्ट केली.
तसेच दोघा भावांना एकत्र येण्यापासून मी रोखलंय का? असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला आणि जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर मला याचा आनंद आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
माध्यमांशी पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज ठाकरे जे आम्हाला प्रश्न विचारतात तोच प्रश्न राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला पाहिजे की, तुमच्या काळात पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा निर्णय का? घेण्यात आला हा प्रश्न राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी विचारला पाहिजे. असं देखील माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र हादरलं, पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
तर विरोधकांची भूमिका दुटप्पी असून हे लोक सत्तेत असताना वेगळी असतात आणि विरोधात असताना वेगळी असतात. जर यांना खासगीत विचारले तर यांची तिसरी भूमिका असते त्यामुळे ते काय म्हणतायं याच्याशी आमचा काही देणंघेणं नाही. आम्ही उत्तर महाराष्ट्राला देणार आहोत. असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.