Video : कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी; मोकाट वक्तव्य करत कोकाटेंनी फोडलं दादांवर खापर

Manikrao Kokate New Statment Over His Ministry : कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असून अजित पवार यांनी मला हे कृषी खाते जाणीवपूर्वक दिले आहे असे विधान राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले आहे. ते छ.संभाजीनगर येथे अ. भा. बळीराजा संघटना भारततर्फे एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन, शेती आधारित व्यवसायात करिअर करावे, असा सल्लाही दिला.
महायुतीला मोठा धक्का बसणार; ‘हा’ बडा नेता सोडणार साथ, लवकरच काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?
आता काय ढेकळांचे पंचनामे करायचे का?
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सतत काहीनाकाही विधाने करुन चर्चेत राहत असतात. नुकतचं त्यांनी अवकाळीची पाहणी करताना कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाने तापलेले वातावरण शांत होत नाही तोच आता पुन्हा कोकाटेंनी स्वतःच्याच मंत्रिपदाबाबत मोकाट विधान केले आहे.
स्वतःच्याच मंत्रिपदाबाबत मोकाट विधान
कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असून आपल्याला हे पद दिलंय असे कोकाटे म्हणाले. अजित पवार (Ajit Pawar) यांनी मला हे कृषी खाते जाणीवपूर्वक दिले आहे. मात्र असे असतानाही यात चांगले काम करता येऊ शकते. हे उदाहरणही आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचे असल्याचे कोकाटे म्हणाले. आजही देशात महाराष्ट्र सर्वच बाबतीत अव्वल असल्याचे ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आता…, ‘त्या’ प्रकरणात पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
दादांनी जाणीवपूर्क कृषी खातं दिलं
राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काम करण्यास सकारात्मक असून, अजितदादांनी तर शेतीतील विविध तंत्रज्ञासाठी 500 कोटींची तरतूद केल्याचेही यावेळी कोकाटेंनी सांगितले. एवढेच नव्हे तर आणखीन हजार पाचशे कोटी लागले तरी मी देईल पण शेतकरी हा एकदम स्वयंभू झाला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे यासाठी माझा सातत्याने वरिष्ठांशी पाठपुरावा सुरू असतो असे कोकाटे म्हणाले. पण दादांनी मला जाणीवपूर्वक कृषीचं खातं दिलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की, कृषिमंत्री म्हणजे तशी ओसाड गावची पाटीलकीच आहे. पण कसही असलं तरी त्यामध्येसुद्धा चांगले काम करता येऊ शकते. हे उदाहरणही आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचे असल्याचे कोकाटे म्हणाले.
अजित पवारच निर्णय घेतील
कोकाटेंच्या विधानांबाबत बोलताना भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय अजित पवारच करू शकतात. समाजाला वाईट वाटेल असे कुठले ही अपशब्द किंवा वाक्प्रचार कोणत्याही मंत्र्यांनी करू नये, जेणेकरून समाजमन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं वर्तन मंत्र्यांकडून अपेक्षित नाही अशा सूचना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. कोकाटे जर बोलले आहेत तर अजित पवार विचार करतील असे बावनकुळे म्हणाले.
Video : फडणवीसांच्या पोटातलं ओठांवर आलचं; शिंदे अन् दादांचे अवगुण थेट सांगून टाकले
अंगावर घेऊ नका सांगितलं होतं; कोकाटेंमुळे महायुतीत वादाची ठिणगी
माणिकराव कोकाटेंनी वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण होऊन राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, कोकाटेंच्या वादग्रस्त विधानामुळे महायुती सरकारची प्रतिमा मलिन होत असून, महायुतीतील नेत्यांची याबाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे.
एवढेच नव्हे तर, ढेकळांचे पंचनामे करायचे का? या विधानानंतर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना माणिकराव कोकाटे यांना वादग्रस्त वक्तव्य करून अंगावर घेऊ नका, असा सल्ला दिला होता. पण त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे सरकारची देखील बदनामी होते, असंही शिरसाट यांनी म्हटलं.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सतत काहीनाकाही विधाने करुन चर्चेत राहत असतात. #Manikraokokate #Farmer #Ajitpawar @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @kokate_manikrao @rautsanjay61 @PawarSpeaks @RRPSpeaks pic.twitter.com/pencqjeyqe
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 31, 2025