सरकारी काम आणि दहा महिने थांब! जयंत पाटलांनी जाहीर केली नाराजी, वजन ठेवल्याशिवाय…

Jayant Patil on 35 Crore Scam In Farmers Compensation : ‘सरकारी काम आणि दहा महिने थांब’ याचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना प्रकर्षाने येत आहे. सरकारी कार्यालयात गेल्यावर कोणतेच काम वजन (Corruption) ठेवल्याशिवाय होत नाही, असा नागरिकांचा अनुभव आहे अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली आहे.
34 कोटी 97 लाख रुपयांचा गैरव्यवहार
जालना जिल्ह्यात अनुदान वाटपात अफरातफर झाल्याचे पुढे आले आहे. 2022-23 तसेच 2024 मध्ये अतिवृष्टी, पूर गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या अनुदान वाटपात 26 तलाठ्यांनी बनावट शेतकरी दाखवून (Farmers Compensation) तब्बल 34 कोटी 97 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समितीच्या चौकशीत उघड झालं आहे, या प्रकरणावर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत! ठाण्यातील बॅनरची चर्चा रंगली, कोणी लावले बॅनर?
‘सरकारी काम आणि दहा महिने थांब’ याचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना प्रकर्षाने येत आहे. सरकारी कार्यालयात गेल्यावर कोणतेच काम वजन ठेवल्याशिवाय होत नाही, असा नागरिकांचा अनुभव आहे.
जालना जिल्ह्यात तर अनुदान वाटपात अफरातफर झाल्याचे पुढे आले आहे. २०२२-२३ तसेच २०२४ मध्ये अतिवृष्टी, पूर…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 11, 2025
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया देताना पुढे ते म्हणाले की, राज्यात भ्रष्टाचार फोफावत चालला आहे. ही धोक्याची घंटा आहे. प्रशासनावर वचक राहिलेला नाही. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष द्यावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
“जयंत पाटील राजकारणातून संपलेला विषय, दिवा विझताना जसा..”, पडळकरांची जहरी टीका
अनुदान वाटपात घोटाळा
अतिवृष्टी आणि गारपिटीच्या अनुदान वाटपात जालना (Jalna) जिल्ह्यातील 26 तलाठ्यांनी बनावट शेतकरी दाखवले. तब्बल 34 कोटी 97 लाख रुपयांचा गैरव्यवहार केलाय. यात काही ग्रामसेवक, कृषी सहायकांचा देखील समावेश आहे. 79 कोटींपैकी 72 कोटींची तपासणी पूर्ण झालीय. तर उर्वरित सात कोटीचे गौंडबंगाल कायम आहे. अनुदान वाटपामध्ये गैरव्यवहार उघडकीस आलाय. संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावलीहे. गैरव्यवहार रकमेची वसुली, निलंबन करून आवश्यक कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.