Lok Sabha Election : महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान; कुठल्या जिल्ह्यात कधी मतदान ?

Lok Sabha Election : महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान; कुठल्या जिल्ह्यात कधी मतदान ?

नवी दिल्ली अखेर मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या लोकसभेसाठी पंचवार्षिक निवडणुकीची (Lok Sabha Election ) घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission of India) आज (16 मार्च) विज्ञान भवनात पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेसोबतच, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा केली. यानुसार एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यानंतर चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. या घोषणेनंतर देशात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. (Election for the 18th Lok Sabha has been announced by the Election Commission of India)

असा असणार निवडणूक कार्यक्रम

एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यात पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे, चौथ्या टप्यासाठी 13 मे, पाचव्या टप्यासाठी 20 मे, सहाव्या टप्यासाठी 25 मे आणि सातव्या टप्यासाठी एक जून रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात मतदान :

यात महाराष्ट्रामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

पहिला टप्पा –

27 मार्च, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

28 मार्च, अर्जाची छाननी

30 मार्च, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत

19 एप्रिल, मतदान

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (पाच मतदारसंघ)

दुसरा टप्पा –

4 एप्रिल, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

5 एप्रिल, अर्जाची छाननी

8 एप्रिल, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत

26 एप्रिल, मतदान

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी (आठ मतदारसंघ)

तिसरा टप्पा –

19 एप्रिल, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

20 एप्रिल, अर्जाची छाननी

22 एप्रिल, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत

07 मे, मतदान

रायगड, बारामती, उस्मनाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले (11 मतदारसंघ)

चौथा टप्पा –

25 एप्रिल, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

26 एप्रिल, अर्जाची छाननी

29 एप्रिल, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

13 मे, मतदान

नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड (11 मतदारसंघ)

पाचवा टप्पा –

3 मे, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

4 मे, अर्जाची छाननी

6 मे, मागे घेण्याची अंतिम मुदत

20 मे, मतदान

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण (13 मतदारसंघ)

चार जून रोजी मतमोजणी अन् निकाल

यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये :

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत देशभरातून 96 कोटी 80 लाख मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी 49.7 कोटी पुरुष आणि 47 कोटी महिला मतदार आहेत. तर 48 हजार ट्रान्सजेंडर मतदारही मतदान करणार आहेत. यामध्ये 21 कोटी 50 लाख युवा मतदार आहेत. त्यातही एक कोटी 82 लाख प्रथम मतदारअसणार आहेत. याशिवाय 82 लाख मतदार 85 वर्षांवरील आहेत, तर 2 लाख 18 हजार मतदार हे 100 वर्षांवरील आहेत. या सर्वांसाठी 10 लाख 50 हजार मतदान केंद्रे असणार आहेत. तर 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. यासाठी दीड कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत.

याव्यतिरीक्त प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ अधिका-यांच्या अखत्यारित 24 तास कंट्रोल रूम सुरू असणार आहे. कुठेही हिंसा होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.  कोणी मुफ्त वस्तू कोणी वाटत असेल, पैसा वाटप होत असेल तर निवडणूक आयोगाला कळविण्याचे आवाहनही मुख्य निवडणूक आयुक्तांनी केले. या तक्रारीवर 100 मिनिटात कारवाई केली जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले. यासोबतच ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना तीनवेळा न्यूज पेपर, वृत्तवाहिन्यांमध्ये मध्ये माहिती द्यावी लागणार आहे. राजकीय पक्षांनाही तुम्हाला गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला उमेदवार का मिळाला नाही, याची माहिती द्यावी लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज