देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीत कोणती चर्चा झाली? संजय राऊतांनी केला मोठा दावा

देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीत कोणती चर्चा झाली? संजय राऊतांनी केला मोठा दावा

Sanjay Raut On Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी घडत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. सगळेच पक्ष तयारीला लागले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे यांच्या (Devendra Fadnavis) युतीची चर्चा सुरू होती, याच दरम्यान नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि राज ठाकरेंची भेट झाली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. तर संजय राऊत यांनी (Sanjay Raut) दावा केलाय की, या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती माझ्याकडे आहे.

सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून त्यांनी हा दावा (Maharahtra Politics) केलाय. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात मराठी माणसांच्या भविष्याबद्दल चर्चा झाली असावी, परंतु ही चर्चा एकतर्फीच असावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

ब्रेकिंग! केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटसह 5 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात मदाऱ्यांचा खेळ

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे 12 जून रोजी सकाळी वांद्र्याच्या ‘ताज’ हॉटेलमध्ये भेटले होते. दोघांमध्ये मराठी माणसांच्या भविष्याबद्दल चर्चा झाली असावी, परंतु ती एकतर्फीच असावी. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करू पाहणाऱ्या गौतम अदानींचे फडणवीस उघड समर्थक आहेत. त्यांनी मुंबईच्या सर्व जमिनी अदानींना दिल्या. मुंबईला भिकारी करून सगळा माल गुजरातला नेण्याचा डाव आहे का? असा प्रश्न राज ठाकरेंनी फडणवीसांना विचारला असावा, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

लग्न होऊन सुहागरात्रीच्या दिवशीच वधूने… ‘या’ घटनेमुळं वराचं अख्ख कुटुंब हादरलं

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

महाराष्ट्रात सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू असल्याची टीका संजय राऊथ यांनी केलीय. लोकं किंड्या मुंग्यासारखे मरत आहेत. राजकारणी लोकं अश्रू ढाळणयाचं काम करतात. या परिस्थितीने मोदी जराही विचलीत होत नाही. ते निर्विकारपणे सत्तेच्या खुर्चीवर विराजमान आहेत. सरकार राजकारणातून पैसा गोळा करण्यात गुंतलं आहे. मुंबई महापालिकेची लढाई सुरू आहे. महाराष्ट्राची लुट उघडपणे सुरू असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.

सर्व व्यवहारांमध्ये भाजप, फडणवीस, शिंदे, अमित शहा यांना किती मलिदा मिळणार? ही सरळ लाचखोरी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्रांत सगळ्यांत जास्त भ्रष्टाचार सुरू असून पैसे दिल्याशिवाय झोपडपट्टी पुनर्विकासाची एकही फाईल सरकत नाही. हेच प्रकार मंत्रालयापासून ते एसआरएपर्यंत सुरू आहेत,असंही सामनात रोखठोकपणे मांडलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube